Independence Day : संपूर्ण देश मणिपूरसोबत -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: संपूर्ण देशात आज ७७व्या स्वातंत्र्यदिनाचा (independence day) उत्साह आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण (flag hoisting) केले. यानंतर नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहे. त्यांनी देशातील १४० कोटी जनतेला संबोधित करताना म्हटले की हा देश म्हणजे एक कुटुंब आहे.




aren



संपूर्ण देश मणिपूरसोबत


यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मणिपूरचा उल्लेख केला. तेथे झालेली हिंसा ही दुख:द आहे असेही ते म्हणाले तसेच यावेळेस संपूर्ण देश मणिपूरसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही आठवड्यात तेथे झालेल्या हिंसेमुळे अनेकांना आपले प्राण नाहक गमवावे लागले. माता-भगिनींच्या सन्मालाही ठेच पोहोचवली गेली. मात्र काही दिवसांपासून तेथून शांततेच्या बातम्या येत आहेत. मणिपूरच्या लोकांनी गेल्या काही दिवसांपासून जी शांतता कायम ठेवली आहे त्यांनी हे असेच सुरू ठेवावे. राज्य आणि केंद्र सरकार मिळून या समस्येचे निराकरण करण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे.



युवा शक्ती सामर्थ्यवान


पंतप्रधान मोदींनी सांगितले की आज युवा पिढी जे काही करत आहे त्याचा प्रभाव १००० वर्षांपर्यंत देशात दिसेल. देशात तरुणांना हे सौभाग्य मिळाले आहे. त्यांनी ही संधी गमावता कामा नये. युवा शक्तीमध्ये सामर्थ्य आहे आणि आमचे धोरण त्यांना पाठिंबा देणे आहे.



नैसर्गिक आपत्तीमध्ये जीव गमावलेल्या व्यक्तींप्रती व्यक्त केला शोक


पंतप्रधान म्हणाले देशातील विविध ठिकाणी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. ज्या कुटुंबासोबत हे घडले त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकारकडून या संकटांचा सामना करत वेगाने विकासाच्या दिशेने जात आहे. असा विश्वास मी तुम्हाला देतो.

Comments
Add Comment

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याने प्रत्येक भारतीय नाराज, पंतप्रधानांनी केले ट्वीट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी

आयएनएस 'अँड्रॉथ' भारतीय नौदलात दाखल, किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम

भारतीय नौदल किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम असेल नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमवारी विशाखापट्टणम

माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा; १००० गिर्यारोहक अडकले, बचावकार्य सुरू

नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच