Independence Day : संपूर्ण देश मणिपूरसोबत -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: संपूर्ण देशात आज ७७व्या स्वातंत्र्यदिनाचा (independence day) उत्साह आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण (flag hoisting) केले. यानंतर नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहे. त्यांनी देशातील १४० कोटी जनतेला संबोधित करताना म्हटले की हा देश म्हणजे एक कुटुंब आहे.




aren



संपूर्ण देश मणिपूरसोबत


यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मणिपूरचा उल्लेख केला. तेथे झालेली हिंसा ही दुख:द आहे असेही ते म्हणाले तसेच यावेळेस संपूर्ण देश मणिपूरसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही आठवड्यात तेथे झालेल्या हिंसेमुळे अनेकांना आपले प्राण नाहक गमवावे लागले. माता-भगिनींच्या सन्मालाही ठेच पोहोचवली गेली. मात्र काही दिवसांपासून तेथून शांततेच्या बातम्या येत आहेत. मणिपूरच्या लोकांनी गेल्या काही दिवसांपासून जी शांतता कायम ठेवली आहे त्यांनी हे असेच सुरू ठेवावे. राज्य आणि केंद्र सरकार मिळून या समस्येचे निराकरण करण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे.



युवा शक्ती सामर्थ्यवान


पंतप्रधान मोदींनी सांगितले की आज युवा पिढी जे काही करत आहे त्याचा प्रभाव १००० वर्षांपर्यंत देशात दिसेल. देशात तरुणांना हे सौभाग्य मिळाले आहे. त्यांनी ही संधी गमावता कामा नये. युवा शक्तीमध्ये सामर्थ्य आहे आणि आमचे धोरण त्यांना पाठिंबा देणे आहे.



नैसर्गिक आपत्तीमध्ये जीव गमावलेल्या व्यक्तींप्रती व्यक्त केला शोक


पंतप्रधान म्हणाले देशातील विविध ठिकाणी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. ज्या कुटुंबासोबत हे घडले त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकारकडून या संकटांचा सामना करत वेगाने विकासाच्या दिशेने जात आहे. असा विश्वास मी तुम्हाला देतो.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव