Independence Day : संपूर्ण देश मणिपूरसोबत -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: संपूर्ण देशात आज ७७व्या स्वातंत्र्यदिनाचा (independence day) उत्साह आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण (flag hoisting) केले. यानंतर नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहे. त्यांनी देशातील १४० कोटी जनतेला संबोधित करताना म्हटले की हा देश म्हणजे एक कुटुंब आहे.




aren



संपूर्ण देश मणिपूरसोबत


यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मणिपूरचा उल्लेख केला. तेथे झालेली हिंसा ही दुख:द आहे असेही ते म्हणाले तसेच यावेळेस संपूर्ण देश मणिपूरसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही आठवड्यात तेथे झालेल्या हिंसेमुळे अनेकांना आपले प्राण नाहक गमवावे लागले. माता-भगिनींच्या सन्मालाही ठेच पोहोचवली गेली. मात्र काही दिवसांपासून तेथून शांततेच्या बातम्या येत आहेत. मणिपूरच्या लोकांनी गेल्या काही दिवसांपासून जी शांतता कायम ठेवली आहे त्यांनी हे असेच सुरू ठेवावे. राज्य आणि केंद्र सरकार मिळून या समस्येचे निराकरण करण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे.



युवा शक्ती सामर्थ्यवान


पंतप्रधान मोदींनी सांगितले की आज युवा पिढी जे काही करत आहे त्याचा प्रभाव १००० वर्षांपर्यंत देशात दिसेल. देशात तरुणांना हे सौभाग्य मिळाले आहे. त्यांनी ही संधी गमावता कामा नये. युवा शक्तीमध्ये सामर्थ्य आहे आणि आमचे धोरण त्यांना पाठिंबा देणे आहे.



नैसर्गिक आपत्तीमध्ये जीव गमावलेल्या व्यक्तींप्रती व्यक्त केला शोक


पंतप्रधान म्हणाले देशातील विविध ठिकाणी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. ज्या कुटुंबासोबत हे घडले त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकारकडून या संकटांचा सामना करत वेगाने विकासाच्या दिशेने जात आहे. असा विश्वास मी तुम्हाला देतो.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत