Independence Day : संपूर्ण देश मणिपूरसोबत -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: संपूर्ण देशात आज ७७व्या स्वातंत्र्यदिनाचा (independence day) उत्साह आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण (flag hoisting) केले. यानंतर नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहे. त्यांनी देशातील १४० कोटी जनतेला संबोधित करताना म्हटले की हा देश म्हणजे एक कुटुंब आहे.




aren



संपूर्ण देश मणिपूरसोबत


यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मणिपूरचा उल्लेख केला. तेथे झालेली हिंसा ही दुख:द आहे असेही ते म्हणाले तसेच यावेळेस संपूर्ण देश मणिपूरसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही आठवड्यात तेथे झालेल्या हिंसेमुळे अनेकांना आपले प्राण नाहक गमवावे लागले. माता-भगिनींच्या सन्मालाही ठेच पोहोचवली गेली. मात्र काही दिवसांपासून तेथून शांततेच्या बातम्या येत आहेत. मणिपूरच्या लोकांनी गेल्या काही दिवसांपासून जी शांतता कायम ठेवली आहे त्यांनी हे असेच सुरू ठेवावे. राज्य आणि केंद्र सरकार मिळून या समस्येचे निराकरण करण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे.



युवा शक्ती सामर्थ्यवान


पंतप्रधान मोदींनी सांगितले की आज युवा पिढी जे काही करत आहे त्याचा प्रभाव १००० वर्षांपर्यंत देशात दिसेल. देशात तरुणांना हे सौभाग्य मिळाले आहे. त्यांनी ही संधी गमावता कामा नये. युवा शक्तीमध्ये सामर्थ्य आहे आणि आमचे धोरण त्यांना पाठिंबा देणे आहे.



नैसर्गिक आपत्तीमध्ये जीव गमावलेल्या व्यक्तींप्रती व्यक्त केला शोक


पंतप्रधान म्हणाले देशातील विविध ठिकाणी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. ज्या कुटुंबासोबत हे घडले त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकारकडून या संकटांचा सामना करत वेगाने विकासाच्या दिशेने जात आहे. असा विश्वास मी तुम्हाला देतो.

Comments
Add Comment

विमानतळावरचे महागडे पदार्थ खरेदी करायचे नसतील तर ट्राय करा ही आयडिया

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागडे पदार्थ खरेदी करण्याआधी

धक्कादायक! वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, वंशद्वेषातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय

लंडन: ब्रिटनच्या वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय वंशाच्या २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक

भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्यानंतरचे

नोव्हेंबरपासून देशात सुरू होणार नवे नियम, जाणून घ्या सविस्तर!

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिना काहीच दिवसात संपणार असून येणाऱ्या नवीन महिन्यापासून देशभरात आधारकार्डपासून

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि