Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत बिघाडी; शरद पवारांना डच्चू! काय आहेत घडामोडी?

उबाठा गट व काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार


मुंबई : राज्याचे राजकारण (Maharashtra Politics) पाहता कोणतीही शक्यता वर्तवणं कठीण झालं आहे. कधी कोण कुठल्या पक्षाची बाजू घेईल, हे सांगता येत नाही. अनेक उलथापालथी होत असतानाच आता महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाल्याची एक खबर समोर आली आहे. आगामी निवडणुकीत मविआमधील उबाठा गट (Thackeray gat) व काँग्रेस (Congress) एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे ठरले आहे. यांतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला (Sharad Pawar NCP) मात्र वगळण्याची चिन्हे आहेत.


नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांची भेट झाली. ही गुप्तपणे झालेली भेट असली तरी माध्यमांनी ती समोर आणल्याने त्यावर अनेक चर्चा सुरु झाल्या. राष्ट्रवादीत सारं काही आलबेल असल्याचे दावे त्यांचे नेते करतात मात्र ही सरळ सरळ फूट असल्याचे सातत्याने दिसून येते. पण आता मात्र काका-पुतण्यांच्या भेटींमुळे संभ्रम निर्माण होत आहेत. याच कारणाने कदाचित उबाठा आणि काँग्रेस शरद पवारांशिवायच निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरु केल्याची चर्चा आहे.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यात नुकतीच एकांतात चर्चा झाली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीमधून शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डच्चू देण्याची तयारी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने केली असल्याचे स्पष्ट होत आहे. ऐनवेळी राष्ट्रवादीने दगा दिल्यास महाविकास आघाडी कोलमडून पडेल. त्यामुळे आतापासूनच दोन्ही गटांनी आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे. यावर शरद पवारांची नेमकी भूमिका काय, हे मात्र कळू शकलेले नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत