Eknath Shinde in Irshalwadi : कार्यतत्पर मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिनी इर्शाळवाडीत दाखल

निवारा केंद्रांची केली पाहणी


पुढील सहा महिन्यांत पक्की घरे बांधून देणार


रायगड : आज स्वातंत्र्यदिनी (Independence day) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील भूस्खलन (Irshalwadi landslide) दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत दाखल झाले. या ठिकाणी जाऊन त्यांनी निवारा केंद्राची पाहणी केली. येथील सर्व बचावलेल्या लोकांची कंटेनर्समध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना लवकरच पक्की घरे बांधून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच आजचा स्वातंत्र्यदिन त्यांनी इर्शाळवाडीतही साजरा केला.


इर्शाळवाडी दुर्घटनेत उद्ध्वस्त झालेल्या ४२ कुटुंबांची मुख्यमंत्र्यांनी यावेळेस भेट घेतली. या कुटुंबांशी, येथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना व्यवस्थित खायला मिळतंय का, राहण्यात काही अडचणी येत नाहीत ना, या सगळ्याची मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या घटनेला एक महिना पूर्ण झाला असून या कालावधीत सरकारने सर्वांच्या बचावासाठी प्रगतीपथावर काम केलं आहे.



इर्शाळवाडीचं पुनर्वसन करण्यासाठी इर्शाळगडाच्या बाजूलाच असलेली पाच एकरची जागा देण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील सहा महिन्यांत सिडकोच्या माध्यमातून त्या ४२ कुटुंबांना पक्की घरे बांधून देण्यात येणार आहेत. या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या तरुण व शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील उपाययोजना करण्यात येणार आहेत. महिला, तरुण यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला जाणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची  व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी