Drugs found at Murud beach : मुरुड समुद्रकिनार्‍यावर बेवारस पोत्यात आढळले तब्बल 'इतक्या' किंमतीचे ड्रग्ज

ड्रग्ज आलं कुठून?


रत्नागिरी : दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनार्‍यावर (Murud beach) काल दुपारी चार वाजताच्या सुमारास एका बेवारस पोत्यामध्ये ४० लाख रुपये किंमतीचं चरस आढळल्याची एक खळबळजनक बाब समोर आली आहे. पोलिसांनी हे पोतं उघडून पाहिलं असता त्यात १,१५० ग्रॅम वजनाची १५ चरसची पाकिटे आढळून आली.


पोलियांना या पोत्यात अमली पदार्थ असल्याचा संशय होताच त्यामुळे पोलिसांनी जिल्हा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथक मुरुडला दाखल झाल्यावर तपासणी करण्यात आली. त्यातून ही चरसचीच पाकिटे असल्याचं स्पष्ट झालं. पंचासमक्ष पंचनामा करून पाकिटे जप्त करण्यात आली.


पोलीस निरीक्षक आहिरे यांनी ही पाकिटे भिजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती दिली. अशाच प्रकारचे पाकीट सौराष्ट्र (गुजरात) समुद्रकिनारी मिळाले असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, मुरुडच्या समुद्रकिनार्‍यावर इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आलं कुठून याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले