गणपतीला कोकणात जाताय? तर ही बातमी वाचाच

मुंबई: गणेशोत्सव म्हटला की कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू होते. त्यातच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेने खुशखबर आणली आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी गणपती स्पेश गाड्यांच्या अधिक फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यामुळे आता मोठ्या प्रमाणात चाकरमनी आपल्या कोकणातील आपल्या गावाला जाऊ शकतील.


याआधी पश्चिम रेल्वेने चाकरमान्यांसाठी गणपती स्पेशल ट्रेन्स जाहीर केल्या होत्या. त्यात रेल्वेने अधिक फेऱ्या वाढवल्याचे ठरवल्याने चाकरमान्यांची गावाला जाण्याची चिंता मिटली आहे. ज्यांना याआधीच्या रेल्वेचे तिकीट मिळाले नाही त्यांच्यासाठी ही बातमी खरंच आनंदाची आहे. यात उधना येथून मडगाव आणि मंगळुरूला जाणाऱ्या रेल्वे तसेच अहमदाबाद-कुडाळ या मार्गांवर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.



या आहेत विशेष फेऱ्या


रेल्वेच्या या विशेष फेऱ्यांसाठी तिकीट काढण्याची मुभा १२ ऑगस्टपासून असेल. या नव्या घोषणेंतर्गत उधना-मडगाव स्पेशल रेल्वे उधना या ठिकाणाहून शनिवारी आणि बुधवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटणार आहे तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी मडगावला पोहोचेल.


तसेच अहमदाबाद-कुडाळ स्पेशतसेच ल ही गाडी अहदमबाद येथून दर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी कुडाळ येथे पोहोचेल. ही गाडी १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीदरम्यान धावणार आहे. तसेच डाऊन मार्गावरील कुडाळ-अहमदाबाद स्पेशल ट्रेन कुडाळवरून दर बुधवारी सकाळी सहा वाजून ३० मिनिटांनी सुटेल तर ती दुसऱ्या दिवशी ३ वाजून ३० मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल. ही रेल्वे १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत सुरू राहील. या प्रवासादरम्यान ही रेल्वे वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली , विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली आणि सिंधुदुर्ग या स्थानकांवर थांबेल.


तर उधना-मंगळुरू ही स्पेशल ट्रेन उधना येथून दर बुधवारी २० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.३०ला पोहोचेल. ही गाडी १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत सुरू राहील. तर मंगळुरू-उधना ही रेल्वे मंगळुरू येथून दर गुरूवारी २०.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.००वाजता पोहोचले. ही गाडी १४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत चालवली जाणार आहे.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात