Flag hoisting in Pune : कुणाचे रुसवे, कुणाचे फुगवे? आधी नीट माहिती घ्या; अजितदादांचा पत्रकारांना दणका!

  76

पुण्यातील ध्वजारोहणाचा मान न मिळण्याबाबत स्पष्टच बोलले अजितदादा...


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुण्यात ध्वजारोहणाचा (Flag hoisting in Pune) मान न मिळाल्याबाबत माध्यमांमध्ये कालपासून उलटसुलट चर्चा होत आहेत. अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री होते आणि आजतागायत त्यांनी त्या ठिकाणी ध्वजारोहण केले आहे. मात्र यावर्षी हा मान राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांना मिळाल्यामुळे अजितदादा नाराज झाले आहेत, अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आल्या. अजित पवारांनी मात्र यावर आपली स्पष्ट प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा पत्रकारांना अफवा पसरवण्याबाबत फटकारले आहे.


अजितदादा म्हणाले, पत्रकार मित्रांनो मी अनेक वर्षे पुणे शहराचा पालकमंत्री होतो. अनेक वर्षापासून १५ ऑगस्टचं झेंडा वंदन राज्यपालच करतात. इथे कधीही १५ ऑगस्टचं झेंडा वंदन पालकमंत्री करत नाहीत. पालकमंत्री १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं ध्वजारोहण करतात. २६ जानेवारीचं प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण पालकमंत्री करतात. ते मी केलं आहे, गिरीश बापट यांनीही केलं आहे, चंद्रकांतदादा पाटील यांनीही केलं आहे. पण लगेच आता या दादाला संधी नाही, त्या दादांना संधी नाही, हे काय चाललंय तुमचं? किती क्षुल्लक गोष्टींचा बाऊ करता. हे ज्या चॅनलने दाखवलं त्यांनी आधी माहिती घ्यावी.


१५ ऑगस्टचं झेंडावंदन मंत्रालयाच्या समोर मुख्यमंत्री करतात. २६ जानेवारीचं मुंबईतील झेंडावंदन राज्यपाल करतात. ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. कुणाला कुठे ध्वजारोहण करण्याची जबाबदारी द्यावी हा राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या मंत्र्यांना झेंडावंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण तुम्ही काही माहिती घेत नाही आणि उगाच रुसवेफुगवे सांगत बसता. यात कुणाचा रुसवा आणि कुणाचा फुगवा आहे? कुणी तुमच्याकडे रुसून सांगितलं, कुणी फुगून सांगितलं? काही बातमी नसताना उगाच लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा, अशा शब्दांत अजितदादांनी पत्रकारांना सुनावले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित