ST strike : गणेशोत्सवाक गावी एसटीने जाऊचा हां? मग एसटीच्या संपाची 'ही' बातमी वाचाच!

कधी असणार संप? काय आहेत मागण्या?


मुंबई : बेस्ट कंत्राटी कर्मचार्‍यांच्या आठ दिवसांच्या संपानंतर अखेर मागण्या मान्य झाल्याने नुकताच हा संप मागे घेण्यात आला. मात्र दोनच दिवसांनंतर आता एसटी कर्मचार्‍यांकडून संपाची (ST Strike) हाक देण्यात आली आहे. पगारवाढ, पदोन्नती अशा विविध मागण्यांसाठी हे कर्मचारी ११ सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेकडून देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या कोअर कमिटीच्या (Core committee) बैठकीत संपाविषयीचा हा निर्णय घेण्यात आला आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. हे कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात (Azad maidan) बेमुदत उपोषण करणार आहेत. जर सरकारने ऐकले नाही तर १३ सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, १९ सप्टेंबरला गणेशचतुर्थी आहे. कोकण रेल्वेचे (Konkan Railway) बुकिंगही दोन महिन्यांपूर्वीच फुल्ल झाल्याने आता एसटीने प्रवास करु इच्छिणाऱ्यांचेही हाल होणार आहेत.



काय आहेत मागण्या?


१. करारातील तरतुदीनुसार सरकारने ४२% महागाई भत्ता त्वरीत लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत अदा करावा.


२. मूळ वेतनात जाहीर झालेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजारामुळे सेवाज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात.


३. दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा.


४. एसटीची धाववेळ (Running time) निश्चित करावी. तसेच वाहकांचे (Conductor)) बदली धोरण रद्द करावे.


५. खाजगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसेसचा पुरवठा त्वरीत करण्यात यावा.


६. लिपिक- टंकलेखक पदाच्या बढतीसाठी २४० हजर दिवसांची अट रद्द करावी.


७. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास देण्यात यावा.


८. अनेक विभागात १०-१२ वर्षापासून कर्मचारी TTS आहेत त्यांना एकवेळची बाब म्हणून TS करण्यात यावे.


९. जुल्मी शिस्त व आवेदन कार्यपद्धती त्वरीत रद्द करावी.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री