वेंगुर्ले येथे पाकिस्तानी नागरिकाच्या नावावर तब्बल ८५ गुंठे जमीन

‘शत्रू मालमत्ता' शासनाने घेतली ताब्यात; त्या जमिनीभोवती तारेचे कुंपण घालण्याची प्रक्रिया सुरू

वेंगुर्ला : पाकिस्तानचे नागरिकत्व पत्करलेल्या लोकांच्या भारतामधील मालमत्ता ताब्यात घेऊन विक्रीची प्रक्रिया केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली आहे. अशा मालमत्तांना 'शत्रू मालमत्ता' (एनिमी प्रॉपर्टी) असे म्हटले जाते. पाकिस्तानी नागरिकाच्या नावावर असलेली अशी मालमत्ता सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यात आढळली आहे. ८५ गुंठे जागा असलेल्या या मालमत्तेची मोजणी करून शासनाने ती आपल्या ताब्यात घेतली आहे. तेथे आता तारेचे कुंपण घालण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याला वेंगुर्लेचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दुजोरा दिला आहे.


मूळ भारतीय रहिवासी असलेल्या भारतातील काही नागरिकांनी पाकिस्तान मध्ये गेल्यावर तेथील नागरिकत्व स्वीकारले आहे. अशांच्या भारतात मालमत्ता आहेत. या मालमत्तांमधून त्यांना बेदखल करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. शत्रू देशांचे नागरिकत्व स्वीकारलेल्या नागरिकांना त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करतानाच त्यांची मालमत्ता विकण्याची प्रक्रिया केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली आहे.



महाराष्ट्रात अशा २०८ मालमत्ता


महाराष्ट्रात अशा २०८ मालमत्ता असून यात सिंधुदुर्गाचाही समावेश आहे. पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारलेल्या एका व्यक्तीची वेंगुर्ले तालुक्यात मालमत्ता आहे. ही अंदाजे ८५ गुंठे जागा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातील या शत्रू मालमत्तेची शासनाला माहिती मिळताच त्यांनी त्या जमिनीबाबत कागदोपत्री तपासणी केल्यानंतर ती जमीन मयेकर नामक एका व्यक्तीच्या नावे असल्याचे दिसून आले. त्या जमिनीवर आंबा आणि काजू कलमांची लागवड आहे. महसूल विभागाकडून त्या जमिनीची पाहाणी व मोजणी केल्यावर शासनाने ती आपल्या ताब्यात घेतली आहे. तसेच त्या जमिनीवरील झाडांचा लिलाव ही करण्यात आला आहे.


आता मालमत्तेच्या भोवती स्थानिक विकासनिधीतून तारेचे कुंपण घालण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनाने ही जमीन ताब्यात घेतल्यानंतर जमिनीच्या सातबाऱ्यावर भारत सरकारचे नाव आले आहे.


त्यामुळे सद्यस्थितीत जमीन नावावर असलेल्या मयेकर कुटुंबीयांनी आपला यात दोष नसल्याचे सांगत न्याय मिळविण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात