Yashwant Natyamandir : माटुंग्यातील यशवंत नाट्यमंदिरचा पडदा अखेर उघडणार...

  125

'या' दिवशी होणार पहिला प्रयोग


मुंबई : माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर (Yashwant Natyamandir) हे नाट्यप्रेमींच्या विशेष आवडीचे आहे. मात्र लॉकडाऊनपासून (Lockdown) नुतनीकरणासाठी हे नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते. इथे पुन्हा नाटकाचा प्रयोग कधी होणार आणि कधी तिसरी घंटा वाजणार याच्या प्रतिक्षेत प्रत्येक नाट्यप्रेमी होता. अखेर ही प्रतिक्षा संपली असून उद्या ५ ऑगस्टला यशवंत नाट्यमंदिरात दीर्घ कालावधीनंतर नाटकाचा प्रयोग होणार आहे. याची सुरुवात ‘व्हॅक्युम क्लिनर’ या नाटकाने होणार आहे.


लॉकडाऊनपासून बंद असलेले यशवंत नाट्यमंदिर उद्या ५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. उद्या अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ (Vacuum Cleaner) आणि रविवार ६ ऑगस्टला प्रशांत दामले (Prashant Damle) फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ (Eka Lagnachi Pudhchi Goshta) या नाटकांच्या प्रयोगाने यशवंत रंगमंदिराचा पडदा उघडणार आहे. विशेष म्हणजे या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय या दोन्ही नाटकाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नाट्यपरिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रशांत दामले यांची निवड झाल्यावर त्यांच्या समितीने नाट्यगृह लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी प्रयत्न केले होते. प्रशांत दामले, कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसेच विश्वस्त मंडळ असे सर्वच यासाठी कामाला लागले होते. ३० मे पासून या नाट्यगृहाचे काम जोरात सुरू झाले होते. आता हे नाट्यगृह प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.


यशवंतराव नाट्यसंकुलात आधुनिक, अद्ययावत सुविधा करण्यात आली आहे. अंतर्गत सजावट, ध्वनियंत्रणा, स्वच्छतागृह अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच या नव्या संकुलात पार्किंगचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या या आवडत्या नाट्यगृहात प्रयोगांचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.