Sambhaji Bhide Pen Sabha : संभाजी भिडेंना पेणला सभेसाठी परवानगी देऊ नका; शेकडो साईभक्तांची मागणी

  127

सादर केलेल्या निवेदनात आणखी काय म्हटले आहे?


पेण : शिर्डीचे साई बाबा (Sai Baba Shirdi) तसेच राष्ट्रपुरुष, संत महात्म्यांबाबत वारंवार वादग्रस्त विधान करणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडेंची (Sambhaji Bhide) ६ ऑगस्ट रोजी पेण येथे होणारी सभा रद्द करावी व कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा यासाठी पेण मधील शेकडो साई भक्तांनी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस (Pen Police Station) निरीक्षक देवेंद्र पोळ यांना निवेदन दिले आहे.


हिंदुस्थानासोबत जगातील करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असणारे शिर्डीचे साईबाबा व राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले यांच्या बद्दल मनोहर उर्फ संभाजी भिडेंनी वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे सर्व साईभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारे वक्तव्य करुन नागरिकांच्या भावना दुखावण्याचे काम संभाजी भिडे करत आहेत. त्यामुळे भिडे यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच भिडे हे सातत्याने करत असलेल्या भडकाऊ आणि वादग्रस्त विधानांनी या देशामध्ये काहीतरी वेगळंच घडवून आणायचं आहे का ? असा सवाल या निवेदनातून करण्यात आला आहे.


पेण हे अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडते, त्यामुळे ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता संभाजी भिडे यांच्या पेण येथे होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये. तसेच आयोजकांवर आणि सोशल मीडियावर जाहिरात पोस्ट करून वातावरण बिघडवणाऱ्यांवर भारतीय दंड संहिते नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी साईभक्तांच्या वतीने ओम साई पदयाञी मंडळाचे साई भक्त कल्पेश ठाकूर, मितेश भानुशाली, दिनेश खामकर, महेश म्हात्रे, कमलाकर पाटील, दिनेश पाटील, हिरामण भोईर, संजय भोईर, गणेश जांभळे, राकेश गावंड यांनी पेण तहसिलदार व पेण पोलिसांकडे लेखी निवेदन देत केली आहे. संभाजी भिडे याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३४, १०७, १५३ अ, २९५ अ, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण