राज्यसभेतही जनविश्वास विधेयक मंजूर

मोटार वाहन ते पर्यावरण, कॉपीराईट ते अन्न सुरक्षा, छोट्या उद्योगांना मोठा दिलासा!


नवी दिल्ली : लोकसभेनंतर राज्यसभेतही गुरुवारी (३ ऑगस्ट) बहुचर्चित जनविश्वास विधेयक मंजूर झाले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी हे विधेयक बुधवारी (२ ऑगस्ट) राज्यसभेत मांडले. छोट्या छोट्या कायद्याचे उल्लंघन केल्यानंतर होणारी तुरुंगवासाची शिक्षा बदलून, तिचे रुपांतर आर्थिक दंडात करण्यात आले आहे. क्लिष्ट कायद्याच्या बंधनात अडकल्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास अडथळे येत होते. हे अडथळे दूर करण्याचे काम जन विश्वास विधेयकाने केले आहे. छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या या विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.


अनेक जुन्या कायद्यांत बदल करुन जन विश्वास विधेयक आणलं आहे. या विधेयकामुळे तब्बल ४२ कलमांतर्गत छोट्या छोट्या गुन्ह्यांमध्ये होणाऱ्या गुन्ह्यांना शिक्षेपासून मुक्तता देण्यात आली आहे. जेलवारी ऐवजी गुन्हेगारांना आर्थिक दंड ठोठावला जाणार आहे. हे तेच छोटे छोटे कायदे आहेत ज्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यात अनेक अडथळे येत होते. या विधेयकामुळे व्यापाऱ्यांना खुल्या मनाने व्यवसाय करण्याला चालना मिळेल.


मोदी सरकारने २२ डिसेंबर २०२२ रोजी जन विश्वास विधेयक लोकसभेत मांडलं होतं. त्यानंतर संयुक्त संसदीय समितीकडे हे विधेयक पाठवण्यात आलं होतं. मार्चमध्ये या विधेयकाला अंतिम रुप देण्यात आलं. लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभेतही त्याच्यावर मंजुरीची मोहोर उटवली.


या विधेयकात १९ मंत्रालयाशी संबंधित ४२ अधिनिमयांच्या १८३ तरतुदींमध्ये संशोधनाचा प्रस्ताव देण्यात आला होता.


यामध्ये सार्वजनिक कर्ज कायदा 1944, फार्मसी अधिनियम 1948, सिनेमॅटोग्राफ अधिनियम 1952, कॉपीराईट अधिनियम 1957,ट्रेड मार्क्स अधिनियम 1999, रेल्वे अधिनियम 1989, माहिती तंत्रज्ञान कायदा2000, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940, मोटार वाहन कायदा 1988, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006, मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा 2002, पेटंट कायदा 1970, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, मोटार वाहन कायदा 1988 यासह 42 कायद्यांचा समावेश आहे.


या कायद्यांशी संबंधित होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये आता तुरुंगावारीची शिक्षा बदलून दंडाचा निकष लावण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना कोर्ट-कचेरीपासून मुक्तता मिळणार आहे. शिवाय व्यवसाय करणे आणखी सुरळीत होणार आहे.


जन विश्वास विधेयकामुळे झाडे तोडल्यास किंवा जाळल्यास आता जेलऐवजी दंडाची तरतूद केली आहे. वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्या, उद्योगांना, औद्योगिक कंपनीला जेलऐवजी आता १५ लाखांचा दंड तर संवाद माध्यमांमध्ये चुकीची माहिती किंवा आक्षेपार्ह मेसेजला आता तुरुंगवासा ऐवजी दंडाची शिक्षा होणार आहे. तर रेल्वे स्थानकांवर भीक भिकाऱ्यांना किंवा फेरीवाल्यांना यापुढे तुरुंगवासाची शिक्षा होणार नाही.

Comments
Add Comment

'मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल', गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातून नक्षलवाद संपवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांबद्दल

दिल्लीत पर्यावरणपूरक फटाके फोडण्यास मर्यादित परवानगी

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मध्ये १८ ते २१ ऑक्टोबर २०२५

महिलांच्या अपहरणामध्ये पश्चिम बंगाल देशात आघाडीवर, महाराष्ट्र कितव्या स्थानावर? धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली: देशभरात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विशेषतः महिलांच्या अपहरणाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक

दिवाळीपूर्वी दिल्लीत 'कृत्रिम पाऊस' पाडण्याची योजना

दिल्लीच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी 'कृत्रिम पावसाचा' आधार! नवी दिल्ली: दिवाळीच्या अवघ्या एका आठवड्यापूर्वी

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या एसी लक्झरी कोचची झलक सादर

नवी दिल्ली : इंडो-रशियन संयुक्त उपक्रम काइनेट रेल्वे सोल्युशन्सने बुधवारी राजधानीतील भारत मंडपम येथे आयोजित

बघा, तुम्ही वापरता 'ती' टूथपेस्ट नकली; फॅक्टरीचा पर्दाफाश!

बनावट ENO, Maggi, सिगारेट, कॉस्मेटिक्स नंतर आता कोलगेट, सेन्सोडाईन टूथपेस्टमध्ये भेसळ; ९.४३ लाखांचा साठा जप्त नवी