PM Narendra Modi : कर्नाटकात सरकार बदललं आणि दुष्परिणाम दिसायला लागले...

  103

पुण्यात मेट्रो उद्घाटनावेळी मोदींनी कर्नाटक सरकारला केले लक्ष्य


काय म्हणाले मोदीजी?


पुणे : पुण्यातील शिवाजीनगर येथे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya Tilak Purskar) प्रदानाचा कार्यक्रम पार पडताच मोदीजी थेट शिवाजीनगरला होणार्‍या कार्यक्रमासाठी रवाना झाले. यावेळी मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचंही उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी कर्नाटक सरकारला लक्ष्य केले. कर्नाटकात सरकार बदललं आणि दुष्परिणाम दिसायला लागले, असं म्हणत मोदीजींनी विरोधकांवर निशाणा साधला.


पंतप्रधान मोदी म्हणाले, फिनटेक, बायोटेक, अॅग्रीटेक प्रत्येक क्षेत्रात देश प्रगती करत आहे. याचा मोठा लाभ पुण्यालादेखील होत आहे. एकीकडे महाराष्ट्रात विकास होत आहे तर दुसरीकडे शेजारचं राज्य कर्नाटकात काय होतंय ते समोर येत आहे. बंगळूरू मोठं आयटी हब आणि ग्लोबल इन्व्हेस्टर सेंटर आहे. यावेळी कर्नाटकाचा गतीने विकास होणं अपेक्षित होतं परंतु सरकार बदललं आणि जनतेचं नुकसान झालं. कर्नाटकमध्ये ज्या प्रकारच्या घोषणा करुन सरकार बनवलं त्याचे दुष्परिणाम कमी वेळेत दिसून येऊ लागले आहेत. जेव्हा कोणता पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारची तिजोरी मोकळी करतो तेव्हा जनतेचं, तरुणांचं मोठं नुकसान होत असतं. त्या पक्षाचं सरकार तर बनतं परंतु लोकांचं भविष्य अंधारात जातं.


कर्नाटक सरकार मान्य करत आहे की, त्यांच्याकडे बंगळूरु आणि कर्नाटकाच्या विकासासाठी बजेट नाही. ही देशासाठी चिंतेची बाब आहे. अशीच स्थिती राजस्थानमध्येही आहे. कर्जाचा बोजा वाढतोय आणि विकास ठप्प झाला आहे. नीती, नियत आणि निष्ठा विकासासाठी आवश्यक असते, असं मोदी म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक