Haryana : मणिपूरनंतर आता हरियाणा पेटले! जलाभिषेक यात्रेत जाळपोळ

गुरुग्राम : मणिपूर राज्यात पेटलेली आग विझलेली नसतानाच आता हरियाणामधील गुरुग्रामजवळील नूहमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकल्याचे समोर आले आहे. नूहमधील मंदिरात जवळापास २५०० पुरुषांसह महिला आणि लहान मुले जीव मुठीत धरुन बसले आहेत.


यात्रेवर सोमवारी दगडफेक झाल्यानंतर हिंसाचार उसळला. नूह येथे लागलेल्या आगीत अनेक वाहने जळून खाक झाली. पोलीस ठाण्याला आग लावण्यात आली. याशिवाय या चकमकीत अनेक पोलीसही जखमी झाले आहेत. यासोबतच एका होमगार्डचाही मृत्यू झाला आहे.


अचानक उफाळून आलेल्या हिंसाचारात गाड्या, चार चाक्यांवर दगडफेक करुन आग लावण्यात आली. हिंसाचाराच्या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी परिस्थिती नियंतत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. यावेळी पोलिसांकडून हवेतही गोळीबारही करण्यात आला.


गुरुग्रामजवळील नूह परिसरात विश्व हिंदु परिषदेद्वारे बृजमंडळ जलाभिषेक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा गुरुग्राम-अलवर इथल्या राष्ट्रीय महामार्गावर आली तेव्हा तरुणांच्या टोळीने त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरु केली. त्यानंतर या हिंसाचाराने इतके रुद्र रुप धारण केले की, जमावाकडून शासकीय आणि खाजगी वाहनांना टार्गेट करत जाळपोळ सुरु केली.


हिंसाचारानंतर यात्रेतल्या जवळपास २५०० लोकांनी नल्हार महादेव मंदिरात जीव मुठीत धरुन बसले आहेत. मंदिरात बसलेल्या लोकांच्या गाड्या मंदिराच्या बाहेर आहेत. या मंदिर परिसरातून काढण्यात पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंसाचार उफाळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


दरम्यान, सुत्रांकडून घटनास्थळी गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. हिंसाचारामध्ये एकूण २० लोक जखमी झाले असून हिंसाचार रोखण्यासाठी या भागात जमावबंदीसह इंटरनेट बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Vande Bharat Sleeper Train Route : ठरलं! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन ‘या’ मार्गावर धावणार; प्रवाशांची प्रतीक्षा संपली!

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाने आता एक मोठी झेप घेतली असून, देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर'

नववर्षात 'या' पाच राज्यात होणार निवडणूकांची रणधुमाळी! सर्व पक्षांनी केली तयारीला सुरुवात

नवी दिल्ली: राजकीय घटनांबाबत गतवर्षात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव देशाने घेतला. राज्यांनुसार

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या