Aambenali ghat : आंबेनळी घाट वाहतुकीसाठी १५ दिवस बंद

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय


पोलादपूर : रायगड (Raigad) जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट (Aambenali ghat) रस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पुढील १५ दिवसांकरिता पोलादपूर-महाबळेश्वर हा आंबेनळी घाटरस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद करण्याची अधिसूचना जारी केली आहे.


अप्पर पोलीस अधीक्षक रायगड-अलिबाग यांच्या पत्रानुसार आंबेनळी घाट रस्ता हा अरूंद व घाट वळणाचा आहे. रस्त्याच्या बाजूला असणारा डोंगरकडा हा या भागात पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगरावरील माती व मोठमोठे दगड रस्त्यावर येऊ शकतात. तसेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने हा घाट रस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.


कोकण व महाबळेश्वरला जोडणारा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा आंबेनळी घाट आहे. पर्यायी रस्ता पोलादपूर खेड-चिपळूण-पाटण- कराड-कोल्हापूर तसेच पाटणकडून सातारामार्गे पुण्याकडे असा आहे, असे अभिप्राय सादर केले आहेत. या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी महाड डॉ.ज्ञानोबा बाणापुरे यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुषंगाने पोलादपूर महाबळेश्वर या आंबेनळी घाटरस्त्यावरील कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी या अधिसूचना दिनांक २८ जुलैपासून ते पुढील १५ दिवसांकरिता लागू राहतील.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका