Ratnagiri Landslide : पावसाचा हाहाकार! रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख कोंढरण गावात भूस्खलन

गावाकडे जाणारा रस्ताच खचला...


रत्नागिरी : मुसळधार पावसाने (Heavy rainfall) राज्यात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला असून आतापर्यंत मोठं नुकसान झालं आहे. इर्शाळवाडीत दरड कोसळल्याने (Irshalwadi Landslide) अख्खं गाव उद्ध्वस्त झालं. या घटनेनंतर पावसाच्या जोरामुळे भूस्खलनाच्या व दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. कोकणात पावसाने चांगलाच जोर धरला असून रत्नागिरी जिल्ह्यातदेखील भूस्खलनाची (Ratnagiri Landslide) घटना घडली आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख कोंढरण या भागात गुरुवारी २७ जुलैला दुपारी ३ च्या सुमारास भूस्खलन झाले आहे. जमिनीला आणि इथल्या काही घरांनादेखील भेगा पडल्या आहेत. एका घरावर दरड कोसळली आहे. जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अमृता साबळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कोंढरण गावातील ५० घरांतील ८० रहिवाशांचं तुळसणी हायस्कूलमध्ये तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं आहे.



घरांचे झाले नुकसान


कोंढरण येथील सचिन केशव शिंदे यांच्या घराशेजारी पाण्याच्या धारा लागल्या असुन मोठी भेग पडली आहे व त्या घराला धोका आहे. तर विनीत रामचंद्र शिंदे यांचे इंदिरा आवास योजनेतील घर पूर्णपणे दरडी खाली गेले आहे. विनित शिंदे यांनी हे घर नुकतेच बांधून पूर्ण केले होते. मात्र त्या घरात कोणी राहत नसल्यामुळे ते व त्यांचे कुटुंब या घटनेतून वाचले आहेत. दरड कोसळल्याची घटना समजताच तहसीलदार अमृता साबळे, मंडळ अधिकारी डि. के. फुलोरे, तलाठी एम. एल. जादगार, देवरुख पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, माजी आमदार सुभाष बने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.



गावाकडे जाणारा रस्ता खचला


पावसामुळे कोंढरण एस टी स्टॉप पासुन ५००मीटर पर्यंत रस्ता देखील खचला आहे. ठिकठिकाणी भेगा पडत आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आणखी प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. आज पासुन गावात जाण्यासाठी मज्जाव केला आहे तर दुसरीकडे या गावात जाणारा डांबरी रस्ताच भूस्खलनामुळे खचला आहे. सध्या कोंढरण गावातील नागरिक तुळसणी हायस्कूलच्या ठिकाणी थांबले असून ते पावसाचा जोर कमी होण्याच्या प्रतिक्षेत आहेत तर काही कुटुंबे आपल्या नातेवाईकांकडे अन्य गावी स्थलांतरीत होत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण