Ratnagiri Landslide : पावसाचा हाहाकार! रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख कोंढरण गावात भूस्खलन

Share

गावाकडे जाणारा रस्ताच खचला…

रत्नागिरी : मुसळधार पावसाने (Heavy rainfall) राज्यात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला असून आतापर्यंत मोठं नुकसान झालं आहे. इर्शाळवाडीत दरड कोसळल्याने (Irshalwadi Landslide) अख्खं गाव उद्ध्वस्त झालं. या घटनेनंतर पावसाच्या जोरामुळे भूस्खलनाच्या व दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. कोकणात पावसाने चांगलाच जोर धरला असून रत्नागिरी जिल्ह्यातदेखील भूस्खलनाची (Ratnagiri Landslide) घटना घडली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख कोंढरण या भागात गुरुवारी २७ जुलैला दुपारी ३ च्या सुमारास भूस्खलन झाले आहे. जमिनीला आणि इथल्या काही घरांनादेखील भेगा पडल्या आहेत. एका घरावर दरड कोसळली आहे. जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अमृता साबळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कोंढरण गावातील ५० घरांतील ८० रहिवाशांचं तुळसणी हायस्कूलमध्ये तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं आहे.

घरांचे झाले नुकसान

कोंढरण येथील सचिन केशव शिंदे यांच्या घराशेजारी पाण्याच्या धारा लागल्या असुन मोठी भेग पडली आहे व त्या घराला धोका आहे. तर विनीत रामचंद्र शिंदे यांचे इंदिरा आवास योजनेतील घर पूर्णपणे दरडी खाली गेले आहे. विनित शिंदे यांनी हे घर नुकतेच बांधून पूर्ण केले होते. मात्र त्या घरात कोणी राहत नसल्यामुळे ते व त्यांचे कुटुंब या घटनेतून वाचले आहेत. दरड कोसळल्याची घटना समजताच तहसीलदार अमृता साबळे, मंडळ अधिकारी डि. के. फुलोरे, तलाठी एम. एल. जादगार, देवरुख पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, माजी आमदार सुभाष बने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

गावाकडे जाणारा रस्ता खचला

पावसामुळे कोंढरण एस टी स्टॉप पासुन ५००मीटर पर्यंत रस्ता देखील खचला आहे. ठिकठिकाणी भेगा पडत आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आणखी प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. आज पासुन गावात जाण्यासाठी मज्जाव केला आहे तर दुसरीकडे या गावात जाणारा डांबरी रस्ताच भूस्खलनामुळे खचला आहे. सध्या कोंढरण गावातील नागरिक तुळसणी हायस्कूलच्या ठिकाणी थांबले असून ते पावसाचा जोर कमी होण्याच्या प्रतिक्षेत आहेत तर काही कुटुंबे आपल्या नातेवाईकांकडे अन्य गावी स्थलांतरीत होत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

SSC-HSC Exam : दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर

मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर…

6 mins ago

Nutrition Food : OMG! शालेय पोषण आहारात आढळले सापाचे पिल्लू

चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…

1 hour ago

Milk Price Hike : ग्राहकांच्या खिशाला चाप! गोकुळच्या दूध दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ

मुंबई : सध्या सातत्याने महागाई वाढत चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला…

2 hours ago

Horoscope: जुलै महिन्यात या ४ राशींचे जीवन होणार सुखकर, होणार हे बदल

मुंबई: जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. जुलै २०२४मध्ये ४ मोठे ग्रह शुक्र, बुध, मंगळ आणि…

2 hours ago

Indian Team: टीम इंडियाच्या परतण्याला पुन्हा उशीर, चक्रवाती वादळामुळे सातत्याने येतायत अडचणी

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…

3 hours ago

आजपासून महाग Jioचे सर्व प्लान, ग्राहकांना द्यावे लागणार इतके पैसे

मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…

4 hours ago