NCP fight: आता राष्ट्रवादीच्या चिन्हाच्या लढाईलाही सुरुवात? निवडणूक आयोगाने पाठवली 'ही' नोटीस

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या (NCP) फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) गट विरुद्ध शरद पवार गट असा कायदेशीर लढा उभा राहण्याची चिन्हे आहेत. अजित पवार गटाने पक्षावर केलेल्या दाव्याबाबत शरद पवार (Sharad Pawar) गटाला निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपणच आहोत हा दावा अजित पवारांनी केला आहे, त्याबाबत आपलं उत्तर द्या असं आयोगानं या नोटीशीत म्हटलं आहे. त्यासाठी ३ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.


२ जुलै रोजी, राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ५ जुलै रोजी अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात कागदपत्रं सादर करण्यात आली होती. ३० जून रोजीच पक्षाच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. ४० आमदारांच्या सह्यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचाही दावा करण्यात आला होता. आता या सगळ्याबाबत शरद पवार गटाचं नेमकं आयोगासमोर म्हणणं काय आहे, हे त्यांना कळवावं लागणार आहे.


शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल, देवदत्त कामत हे कायदेशीर बाजू सांभाळणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगात आता शिवसेनेपाठापोठ राष्ट्रवादीच्या चिन्हासाठीची लढाई लवकरच सुरु होण्याची चिन्हं दिसत असल्याचं म्हटलं जात आहे.


दरम्यान, शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं शिंदेंच्या बाजूनं निर्णय दिला होता. त्यामुळे आता अजित पवारांच्या बाबतीत निवडणूक आयोग कोणता निर्णय घेतं, हे पाहणं देखील औत्सुक्याचं असणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत