Tuljabhavani : तुळजाभवानी मंदिरातील शिवकालिन ऐतिहासिक दागिने गहाळ

तुळजापूर : संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचे (Tuljabhavani) शिवकालिन ऐतिहासिक दागिने गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे. यात अगदी शिवकालिन दागिन्यांचा आणि भक्तांनी दान केलेल्या दागिन्यांचा समावेश असल्याचे समजते. या प्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. यात त्यांनी यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ऑन कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे.


छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद केली असता, काही ऐतिहासिक महत्व असलेले मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचे समजते आहे. याची चौकशी व्हावी. तसेच यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ॲान कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा. गहाळ दागिन्यांची संपुर्ण चौकशी करण्याची व संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा स्वराज्याच्या वतीने मोठे आंदोलन उभे करण्याचा इशाराही या पत्राद्वारे देण्यात आला आहे.



छत्रपती संभाजीराजेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र...


संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि श्री छत्रपती घराण्याचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान दागिन्यांचा ताळेबंद करत असता, काही दागिने मिळत नसल्याचे व त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याचे समजते आहे.


यातील काही दागिने श्री शिवछत्रपती महाराजांनी व पुढे छत्रपती घराण्याने भवानी देवीला अर्पण केल्याच्या नोंद असल्याचे समजत असताना हा निष्काळजीपणा कसा घडला? याला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्व भक्तांना पडला आहे.


याची सखोल चौकशी लवकरात लवकर करावी व त्याबाबत सविस्तर अहवाल सार्वत्रिक करावा. अन्यथा या गैरप्रकाराबाबत स्वराज्य पक्षाच्या वतीने मोठे जन आंदोलन उभे करण्यात येईल.


* सध्या समितीने दिलेला अहवाल आम्हास तात्काळ मिळावा.


* पुढील काळात दागिन्यांचा ताळेबंद करत असताना ते व्हिडीओ कॅमे-यासमोर करावेत.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी