MNS workers arrested : खळखट्याक! सिन्नर टोलनाका तोडफोड प्रकरणी आठ मनसैनिकांना अटक

पण अमित ठाकरे म्हणतात...


सिन्नर : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) सिन्नर येथील टोलनाका तोडफोडप्रकरणी पंधरा मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील आठ जणांना वावी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी सिन्नर टोलनाक्यावर तोडफोड केली होती. समृद्धी टोल प्रशासनाने वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनसे विद्यार्थी सेना पदाधिकारी आणि राज्य कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.


या तोडफोडीमध्ये जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याचा दावा समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वतः अमित ठाकरे यांनी टोल व्यवस्थापनाला दोषी ठरवत कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्याचे समर्थनच केले आहे. तेथील मॅनेजरसह कर्मचारी उद्धट भाषेत बोलले असा दावा अमित ठाकरे यांनी केला आहे.



या कार्यकर्त्यांना केली अटक :



  • स्वप्निल संजय पाटोळे (२८, रा. अभियंता नगर कामटवाडे शिवार, नाशिक )

  • ललित नरेश वाघ ( २८, रा.पवन नगर, नवीन नाशिक)

  • शुभम सिद्धार्थ थोरात ( २७, रा. दत्त चौक मार्केट मागे, नवीन नाशिक)

  • मेघराज शाम नवले (२९, रा. पाथर्डी फाटा, नाशिक)

  • शशिकांत शालिग्राम चौधरी ( ३५, रा. कलानगर जेलरोड, नाशिकरोड)

  • बाजीराव बाळासाहेब मते (३४, रा. देवळाली गाव, नाशिक रोड)

  • प्रतीक माधव राजगुरू (२३, रा. सावता नगर नवीन नाशिक)

  • शैलेश नारायण शेलार (३१, रा. खेरवाडी, ता. निफाड)


Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध