Barsu Refinery : बारसू रिफायनरी प्रकल्प होणार, पण ऐतिहासिक कातळशिल्पे...

सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांच्या प्रश्नाला दिले उत्तर


रत्नागिरी : रत्नागिरीतील (Ratnagari) बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्पावरुन वाद चालू आहेत, या प्रकल्पाविरोधात आंदोलनही सुरू आहे. दरम्यान, या रिफायनरीमुळे प्रकल्पासाठी प्रस्तावित जागेवर असलेल्या कातळशिल्पांना धोका निर्माण होणार आहे, असा दावा स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. हाच प्रश्न आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave), विलास पोतनीस (Vilas Potnis) आणि मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी उपस्थित केला होता. त्याला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी लेखी उत्तर दिले आहे.


संबंधित प्रश्नोत्तरात सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, 'रत्नागिरी जिल्ह्यातील ७, सिंधुदुर्गातील १ आणि गोव्यातील ९ ठिकाणची कातळशिल्पे यूनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये बारसूच्या ३ कातळशिल्पांचाही समावेश आहे. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाने बारसू येथील गावात केलेल्या आतापर्यंतच्या सर्वेक्षणात ६२ कातळशिल्पांची बारसूच्या सड्यावर नोंद केलेली आहे. त्यामुळे या कातळशिल्पाच्या संवर्धनासाठी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनातून बारसू येथील कातळशिल्पे असलेली जमीन वगळण्यात येणार आहे”, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. म्हणजेच बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीच्या ठिकाणी ६२ कातळशिल्पांची नोंद असून, त्यांना वगळून रिफायनरी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


बारसू गावातील कातळशिल्पासह एकूण आठ ठिकाणची कातळशिल्पे ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे कातळशिल्पांच्या जतन आणि संवर्धनाची आशा निर्माण झाली. मात्र बारसूमुळे त्यांना धोका निर्माण होईल, अशी चिन्हे दिसत होती. यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी कातळशिल्पांच्या जतनाविषयी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच या कातळशिल्पांसह रत्नागिरीतील १७ ठिकाणच्या कातळशिल्पांचे जतन संवर्धन करण्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी

IRCTC Website Crash : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि ॲप अचानक ठप्प

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना आज एक मोठी तांत्रिक

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक