No entry in Irshalwadi : इर्शाळगडावरील परिस्थिती पाहायला जाणं तुम्हाला चांगलंच महागात पडेल, कारण प्रशासनाने उचललं 'हे' कठोर पाऊल

  137

का घेण्यात आला हा निर्णय ?


रायगड : इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेमुळे (Irshalwadi Landslide) अख्खा महाराष्ट्रच हादरला आहे. राज्यभरातून अनेक ठिकाणांहून दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत पाठवली जात आहे. घटनेला तीन दिवस झाले असले तरी अजूनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. असे असले तरी काही मदतीसाठी न बोलावता गडावर येणारे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, ट्रेकर्स यांमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. इर्शाळगड हा एक प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंट असल्याने काहीजण केवळ कुतूहलापोटी इर्शाळगडावर जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन मदतकार्यात नेमलेल्या व्यक्तींशिवाय इतरांना गडावर जाण्यास रविवार २३ जुलैपासून पासून पुढील पंधरा दिवस १४४ कलमाद्वारे मनाई (No entry in Irshalwadi) करण्यात आली आहे.


भूस्खलनग्रस्त भागात मृतदेहांमधून दुर्गंधी पसरली आहे, त्यानंतर इर्शालवाडी आणि नानिवली गावात कलम १४४ (Section 144) लागू करण्यात आले आहे. कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी शनिवारी विशेष आदेश लागू केले. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर इर्शाळगडावर मदतीसाठी आवश्यक यंत्रणा उभी केली असून गडावर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही गर्दी होत होती. तर अनेक वृत्तसंस्थांचे प्रतिनिधीही असल्यामुळे आणखी गर्दी होत होती. त्यामुळे आता मदतकार्यात नेमलेल्या व्यक्ती व संस्थांव्यतिरिक्त इतर कोणालाही पुढील पंधरा दिवसांसाठी गडावर जाता येणार नाही, असे आदेश काढण्यात आले आहेत. १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश देखील लागू करण्यात आले आहेत. २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.


इर्शाळवाडीतील भीषण दरड दुर्घटनेनंतर विविध पथके तेथे कसून मदत व बचावकार्य करीत आहेत. परंतु खराब हवामान, निसरडी पायवाट, बचावकार्यासाठी आवश्यक साधनसामग्री नेण्यासाठी नसलेल्या सुविधा या सर्वच बाबींमुळे बचावकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत. ढिगा-यांखाली गाडल्या गेलेल्या मृत प्राण्यांची दुर्गंधी येऊ लागली आहे. अशा ब-याच आपत्त्तींचा सामना करत एनडीआरएफ (NDRF), टीडीआरएफ (TDRF) आणि इतर यंत्रणा दरड हटवण्याचे काम करत आहेत. मात्र इर्शाळवाडीवर मदतीसाठी येणारे ट्रेकर्स, सामाजिक कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे. अनेकजण निव्वळ कुतूहलापोटी डोंगरावर अवघड रस्त्यावर चढून पाहणी करण्यासाठी जात आहेत. ये-जा करणाऱ्या नागरिकांमुळे डोंगराची पायवाट अधिक निसरडी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलत इतर नागरिकांना इर्शाळगडावर येण्यास बंदी घातली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी