Irshalwadi Victims rehabilitation : उद्यापासून इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवणार

  118

उदय सामंतांनी दिली माहिती


रायगड : इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेमुळे (Irshalwadi Landslide) अख्खा महाराष्ट्रच हादरला आहे. राज्यभरातून अनेक ठिकाणांहून दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत पाठवली जात आहे. घटनेला तीन दिवस झाले असले तरी अजूनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र याबाबत रायगडचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samat) यांनी आज पत्रकारांशी बोलताना एक माहिती दिली आहे. उद्यापासून इर्शाळवाडीतील बचावकार्य बंद करण्यात येईल, परंतु या ठिकाणी जी मुलं अनाथ झाली आहेत, त्यांचा सरकार गांभीर्याने विचार करेल, असं उदय सामंत यावेळी म्हणाले.


इर्शाळवाडीसारख्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ज्या काही उपापयोजना करणे गरजेचे आहे, त्या केल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी योग्य ती मदत जाहीर केली आहे. परंतु यातील भयावह, दुःखदायक आणि क्लेशदायक बाब म्हणजे २२ मुले अनाथ झाली आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी करावंच लागेल. हा प्रसंग खूप जलद गतीने झाला त्यामुळे कोणताही निर्णय घेणं कठीण आहे. मात्र दुर्घटनाग्रस्त अनाथ मुलं किंवा इतर लोकांनाही शासन वार्‍यावर सोडणार नाही, हा माझा पालकमंत्री म्हणून शब्द आहे, असं उदय सामंत म्हणाले.


कलम १४४ नुसार इर्शाळगडावर येण्यास जी बंदी घातली आहे, ती आणखी वाढणार किंवा किती दिवस राहणार याबाबतचा संपूर्ण निर्णय जिल्हाधिकार्‍यांचा राहील, असं उदय सामंत यांनी सांगितलं. तसेच सर्व दुर्घटनाग्रस्तांची आज संध्याकाळपर्यंत तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था होईल. डायमंड पेट्रोल पम्प येथे तात्पुरती जागा घेण्यात आली आहे व तिथे कंटेनरमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात येईल. युद्धपातळीवर, कुठेही एक-दोन वर्षे वाया न घालवता त्यांचं पुनर्वसन चांगल्या घरांमध्ये करण्यात येईल, असा विश्वास उदय सामंत यांनी दिला.


मृतांचा आणि जखमींचा आकडा

दरम्यान,  रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा आतापर्यंत २९ इतका झाला आहे. तर ५२ जण अद्याप बेपत्ता आहेत. या ठिकाणी आजही बचाव मोहीम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले