Irshalwadi Victims rehabilitation : उद्यापासून इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवणार

Share

उदय सामंतांनी दिली माहिती

रायगड : इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेमुळे (Irshalwadi Landslide) अख्खा महाराष्ट्रच हादरला आहे. राज्यभरातून अनेक ठिकाणांहून दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत पाठवली जात आहे. घटनेला तीन दिवस झाले असले तरी अजूनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र याबाबत रायगडचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samat) यांनी आज पत्रकारांशी बोलताना एक माहिती दिली आहे. उद्यापासून इर्शाळवाडीतील बचावकार्य बंद करण्यात येईल, परंतु या ठिकाणी जी मुलं अनाथ झाली आहेत, त्यांचा सरकार गांभीर्याने विचार करेल, असं उदय सामंत यावेळी म्हणाले.

इर्शाळवाडीसारख्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ज्या काही उपापयोजना करणे गरजेचे आहे, त्या केल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी योग्य ती मदत जाहीर केली आहे. परंतु यातील भयावह, दुःखदायक आणि क्लेशदायक बाब म्हणजे २२ मुले अनाथ झाली आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी करावंच लागेल. हा प्रसंग खूप जलद गतीने झाला त्यामुळे कोणताही निर्णय घेणं कठीण आहे. मात्र दुर्घटनाग्रस्त अनाथ मुलं किंवा इतर लोकांनाही शासन वार्‍यावर सोडणार नाही, हा माझा पालकमंत्री म्हणून शब्द आहे, असं उदय सामंत म्हणाले.

कलम १४४ नुसार इर्शाळगडावर येण्यास जी बंदी घातली आहे, ती आणखी वाढणार किंवा किती दिवस राहणार याबाबतचा संपूर्ण निर्णय जिल्हाधिकार्‍यांचा राहील, असं उदय सामंत यांनी सांगितलं. तसेच सर्व दुर्घटनाग्रस्तांची आज संध्याकाळपर्यंत तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था होईल. डायमंड पेट्रोल पम्प येथे तात्पुरती जागा घेण्यात आली आहे व तिथे कंटेनरमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात येईल. युद्धपातळीवर, कुठेही एक-दोन वर्षे वाया न घालवता त्यांचं पुनर्वसन चांगल्या घरांमध्ये करण्यात येईल, असा विश्वास उदय सामंत यांनी दिला.

मृतांचा आणि जखमींचा आकडा

दरम्यान,  रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा आतापर्यंत २९ इतका झाला आहे. तर ५२ जण अद्याप बेपत्ता आहेत. या ठिकाणी आजही बचाव मोहीम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य, १५व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा…

28 mins ago

Watch: फुलांच्या माळा आणि ओपन जीप, असे झाले अर्शदीपचे पंजाबमध्ये स्वागत

मुंबई: अर्शदीप सिंह टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर राहिला. त्याने…

2 hours ago

औट घटकेचा इंद्र ‘राजा नहूष’

विशेष - भालचंद्र ठोंबरे नहूष हा कुरूवंशातील पराक्रमी राजा होता. तो ययातीचा पिता आणि आयूचा…

6 hours ago

कवकांची अद्भुत दुनिया ! (भाग १)

निसर्गवेद - डॉ. महालक्ष्मी वानखेडकर गली खजिन्यातील एक हिरा म्हणजे ही कवक, बुरश्या, भूछत्र, अळंबी,…

6 hours ago

खून पतीचा; जेलमध्ये पत्नी

क्राइम - अ‍ॅड. रिया करंजकर प्रत्येकाला समाजामध्ये नाव कमवायचे असते. त्यामुळे लोक कुठल्याही थराला जाऊन…

6 hours ago

भेटी लागी जीवा…

हलकं-फुलकं - राजश्री वटे पहाटेची सूर्योदयाची वेळ... केशरी रंगाने अवकाश भरून गेले होते! पिवळा पितांबर…

7 hours ago