Irshalwadi Victims rehabilitation : उद्यापासून इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवणार

  116

उदय सामंतांनी दिली माहिती


रायगड : इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेमुळे (Irshalwadi Landslide) अख्खा महाराष्ट्रच हादरला आहे. राज्यभरातून अनेक ठिकाणांहून दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत पाठवली जात आहे. घटनेला तीन दिवस झाले असले तरी अजूनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र याबाबत रायगडचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samat) यांनी आज पत्रकारांशी बोलताना एक माहिती दिली आहे. उद्यापासून इर्शाळवाडीतील बचावकार्य बंद करण्यात येईल, परंतु या ठिकाणी जी मुलं अनाथ झाली आहेत, त्यांचा सरकार गांभीर्याने विचार करेल, असं उदय सामंत यावेळी म्हणाले.


इर्शाळवाडीसारख्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ज्या काही उपापयोजना करणे गरजेचे आहे, त्या केल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी योग्य ती मदत जाहीर केली आहे. परंतु यातील भयावह, दुःखदायक आणि क्लेशदायक बाब म्हणजे २२ मुले अनाथ झाली आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी करावंच लागेल. हा प्रसंग खूप जलद गतीने झाला त्यामुळे कोणताही निर्णय घेणं कठीण आहे. मात्र दुर्घटनाग्रस्त अनाथ मुलं किंवा इतर लोकांनाही शासन वार्‍यावर सोडणार नाही, हा माझा पालकमंत्री म्हणून शब्द आहे, असं उदय सामंत म्हणाले.


कलम १४४ नुसार इर्शाळगडावर येण्यास जी बंदी घातली आहे, ती आणखी वाढणार किंवा किती दिवस राहणार याबाबतचा संपूर्ण निर्णय जिल्हाधिकार्‍यांचा राहील, असं उदय सामंत यांनी सांगितलं. तसेच सर्व दुर्घटनाग्रस्तांची आज संध्याकाळपर्यंत तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था होईल. डायमंड पेट्रोल पम्प येथे तात्पुरती जागा घेण्यात आली आहे व तिथे कंटेनरमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात येईल. युद्धपातळीवर, कुठेही एक-दोन वर्षे वाया न घालवता त्यांचं पुनर्वसन चांगल्या घरांमध्ये करण्यात येईल, असा विश्वास उदय सामंत यांनी दिला.


मृतांचा आणि जखमींचा आकडा

दरम्यान,  रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा आतापर्यंत २९ इतका झाला आहे. तर ५२ जण अद्याप बेपत्ता आहेत. या ठिकाणी आजही बचाव मोहीम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी