Tiger death : टिपेश्वर अभयारण्यात सापडला वाघाचा मृतदेह

मृत्यूचे कारण अस्पष्ट


पांढरकवडा : यवतमाळमधील टिपेश्वर अभयारण्यांतर्गत (Tipeshwar Sanctuary) पाटणबोरी वन्यजीव परिक्षेत्रांतर्गत अर्ली वर्तुळातील, भवानखोरी बिट कक्ष क्र. १०५ मध्ये गुरुवारी सकाळी एक नर वाघ मृतावस्थेत आढळून (Tiger death) आला. या वाघाचं वय अंदाजे दीड ते दोन वर्षे आहे. गस्तीवरच्या वनरक्षकांना हा मृतदेह आढळून आला. दरम्यान, हा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


गुरुवारी सकाळी वनरक्षक राजू तुमराम हे हंगामी मजुरांसह अर्ली वन वर्तुळातील, भवानखोरी बिट कक्ष क्र. १०५ मध्ये गस्त करीत असताना त्यांना एका वाघाचे शव निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. यामुळे वनवर्तुळात खळबळ उडाली असून वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे गूढ अद्याप कायम आहे.


घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वन अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन मृत वाघाचे निरीक्षण केले. प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत. मृत वाघ हा नर असून त्याचे संपूर्ण अवयव मृत्यूपूर्वी शाबूत असल्याचे निरीक्षणातून समजले आहे. तसेच वनअधिकारी यांनी आजूबाजूच्या परिसरात फिरती केली असता कुठेही मानवी पाऊलखुणा आढळून आल्या नाहीत.


पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मृत वाघाचे त्यानंतर सर्वांसमक्ष शवविच्छेदन (Autopsy) केले. शवविच्छेदनाचे आवश्यक ते सीलबंद नमुने तपासणीसाठी उपसंचालक, प्रादेशिक न्याय सहायक, वैज्ञानिक प्रयोगशाळा, अमरावती येथे पाठविण्यात येणार आहेत. वाघाचा मृत्यू कशामुळे झाला, हे तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कळू शकणार आहे. या घटनेचा तपास सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) रवींद्र कोंडावार करीत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर : राज्य