Maharashtra Cabinet Expantion: अखेरीस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला!

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं शिक्कामोर्तब


मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला उधाण आलं असतानाच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे म्हटले आहे. आज देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, जुलै महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेतील,  अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे अखेर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लवकरच निश्चित होणार असल्याचे दिसत आहे. तसेच या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र ठरल्याची माहिती आहे.


दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शपथविधीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आनंद मठाला भेट दिली, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. भाजपला धन्यवाद देतो. आम्ही ५० लोकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यावेळी फडणवीस आणि त्यांची टिम आमच्या सोबत होती, असे शिंदे म्हणाले.



अजित पवार क्लिन बोल्ड


एकनाथ शिंदे म्हणाले, देवेंद्रजींना शरद पवार बोलले की विकेट घेतली मात्र पवारांनी अजित पवारांना क्लिन बोल्ड केले. हे अजित पवार यांना देखील माहित आहे. अजित पवार हे कधी विसरणार नाहीत.



एकनाथ शिंदेच निर्णय घेणार


छत्रपती संभाजीनगर येथे बैठकीबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,  राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठीच काल दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. याशिवाय आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. जुलैमध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू.

Comments
Add Comment

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील