Ashadi Ekadashi : दर्शन रांग पुढे न सरकल्याने वारकरी संतापले

मंदिर समिती व पोलिसांविरोधात घोषणाबाजी


भाविकांना दर्शनासाठी विलंब नको म्हणून मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न


पंढरपूर : भाविकांना दर्शनासाठी अडचण नको (ashadi ekadashi) यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही लवाजमा सोबत न नेता अगदी साध्या पद्धतीने विठुरायाचे दर्शन घेतले. शासकीय पूजेच्या वेळी मुखदर्शन चालू ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. केवळ सहा ते सात मंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पडली. त्यानंतर सत्कार कार्यक्रमात देखील मानपान न पाहता मुख्यमंत्र्यांनी थेट स्वतः भाषण करून कार्यक्रम अर्धा वेळेतच संपवला. मात्र, त्यानंतरही मंदिर समितीकडून दर्शनाचा वेग वाढवण्यात न आल्याने संतप्त वारक-यांनी विठ्ठल मंदिर समिती आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.


मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे दर्शन रांग गतीने पुढे सरकल असे अपेक्षित होते. असे असताना देखील दर्शन रांग पुढे सरकत नसल्याने भाविकांचा संताप वाढत गेला. यातच काही तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यातील काही भाविकांनी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना याबाबत जाब विचारला. काही भाविकांनी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखून सर्वांना शांत केले.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे