Nitesh Rane : संजय राठोडला लावलेला नियम आदित्य ठाकरेला का नाही?

दुजाभाव करणार्‍या उद्धव ठाकरेंना नितेश राणेंनी सुनावले खडेबोल


कणकवली : बाळासाहेबांचे विचार केंद्रस्थानी ठेवून चालत असल्याचे सांगणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतःच्या मुलामध्ये आणि अन्य शिवसैनिकांमध्ये दुजाभाव करतात. याबाबत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या सगळ्याच गैरवर्तणुकीची पोलखोल केली. दुसर्‍यांना सल्ले देणार्‍या संजय राऊतांचाही (Sanjay Raut) चांगलाच समाचार घेतला.


आजच्या सामना वृत्तपत्रात 'आमचा तो बाब्या आणि तुमचा तो कार्टा' असं वाक्य वापरण्यात आलं. हे वाक्य आधी संजय राजाराम राऊतने स्वतःच्या मालकाला सांगावं. जो नियम तुझ्या मालकाने स्वतःच्या कार्ट्याला लावला तो अन्य कुठल्याही शिवसैनिकाला लावलेला नाही. संजय राठोड यांना एका महिलेच्या प्रकरणात उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला लावला होता. तोच प्रकार आदित्य ठाकरेंच्या बाबतीत झाल्यावर मात्र उद्धव ठाकरेंनी समान नागरी कायदा का वापरला नाही? आदित्य ठाकरेवरदेखील दिशा सालियनच्या हत्येचा आरोप आहे, असे खडेबोल नितेश राणे यांनी सुनावले.



संजय राऊत आधी तुम्ही शुद्धीत या

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) झोपेत बोलतात या संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंनी चांगलेच सुनावले. देवेंद्रजी झोपेत बोलत नाहीत तर त्यांनी तुझी आणि तुझ्या मालकाची झोप उडवली आहे. त्यामुळे रोज सकाळी उठून तुम्ही जे नशेत बोलता ते आधी शुद्धीत या, असा इशारा नितेश राणेंनी दिला. मातोश्रीवरील कमी केलेल्या सुरक्षेमुळे तुमची झोप उडाली आणि म्हणून कालचा आदित्य ठाकरेंचा अपघात घडवून आणला असावा, असा माझा थेट संशय आहे, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.



सेनाभवनचं शुद्धीकरण करणार का?

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी पुन्हा एकदा बेईमानी उद्धव ठाकरे यांनी केली. ज्या सेनाभवनला हिंदुत्वाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं तिथे काल मुस्लिम लॉबवरचे लोक आले, मग बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असल्याचं सांगणारे आता सेनाभवनचं शुद्धीकरण करणार का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, शुद्धीकरण जमत नसेल तर सेनाभवनवरील बाळासाहेबांचा फोटो काढून टाका आणि तिथे भोंगे लावा. उगाच मोठमोठ्या बाता करण्यापेक्षा समान नागरी कायदा आधी उबाठा सेनेत आणून दाखवा, असे नितेश राणेंनी खडसावले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण