Nitesh Rane : संजय राठोडला लावलेला नियम आदित्य ठाकरेला का नाही?

  210

दुजाभाव करणार्‍या उद्धव ठाकरेंना नितेश राणेंनी सुनावले खडेबोल


कणकवली : बाळासाहेबांचे विचार केंद्रस्थानी ठेवून चालत असल्याचे सांगणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतःच्या मुलामध्ये आणि अन्य शिवसैनिकांमध्ये दुजाभाव करतात. याबाबत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या सगळ्याच गैरवर्तणुकीची पोलखोल केली. दुसर्‍यांना सल्ले देणार्‍या संजय राऊतांचाही (Sanjay Raut) चांगलाच समाचार घेतला.


आजच्या सामना वृत्तपत्रात 'आमचा तो बाब्या आणि तुमचा तो कार्टा' असं वाक्य वापरण्यात आलं. हे वाक्य आधी संजय राजाराम राऊतने स्वतःच्या मालकाला सांगावं. जो नियम तुझ्या मालकाने स्वतःच्या कार्ट्याला लावला तो अन्य कुठल्याही शिवसैनिकाला लावलेला नाही. संजय राठोड यांना एका महिलेच्या प्रकरणात उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला लावला होता. तोच प्रकार आदित्य ठाकरेंच्या बाबतीत झाल्यावर मात्र उद्धव ठाकरेंनी समान नागरी कायदा का वापरला नाही? आदित्य ठाकरेवरदेखील दिशा सालियनच्या हत्येचा आरोप आहे, असे खडेबोल नितेश राणे यांनी सुनावले.



संजय राऊत आधी तुम्ही शुद्धीत या

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) झोपेत बोलतात या संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंनी चांगलेच सुनावले. देवेंद्रजी झोपेत बोलत नाहीत तर त्यांनी तुझी आणि तुझ्या मालकाची झोप उडवली आहे. त्यामुळे रोज सकाळी उठून तुम्ही जे नशेत बोलता ते आधी शुद्धीत या, असा इशारा नितेश राणेंनी दिला. मातोश्रीवरील कमी केलेल्या सुरक्षेमुळे तुमची झोप उडाली आणि म्हणून कालचा आदित्य ठाकरेंचा अपघात घडवून आणला असावा, असा माझा थेट संशय आहे, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.



सेनाभवनचं शुद्धीकरण करणार का?

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी पुन्हा एकदा बेईमानी उद्धव ठाकरे यांनी केली. ज्या सेनाभवनला हिंदुत्वाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं तिथे काल मुस्लिम लॉबवरचे लोक आले, मग बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असल्याचं सांगणारे आता सेनाभवनचं शुद्धीकरण करणार का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, शुद्धीकरण जमत नसेल तर सेनाभवनवरील बाळासाहेबांचा फोटो काढून टाका आणि तिथे भोंगे लावा. उगाच मोठमोठ्या बाता करण्यापेक्षा समान नागरी कायदा आधी उबाठा सेनेत आणून दाखवा, असे नितेश राणेंनी खडसावले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण