World cup 2023: विश्वचषकातील भारत-पाक सामन्याकरिता हॉटेल बुकींगला सुरुवात

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान सामना (India vs Pak) म्हणजे दोन्ही देशांच्या चाहत्यांसाठी पर्वणी असते. भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (World cup 2023) भारत-पाक सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याकरिता आतापासूनच हॉटेल बुकींगला सुरुवात झाली आहे. तसेच हॉटेलचे दर सध्यापेक्षा तब्बल दहा पटीने वाढल्याचे समजते.


वेगवेगळ्या संकेतस्थळ अथवा ॲपवरून बुकिंग सुरू झाली आहे. दहापटीने रुमचे दर वाढले आहेत. काही हॉटेलच्या किमती एका दिवसासाठी एक लाख रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत. काही रुम बुकही झाल्याचे समजते. भारतात होणाऱ्या विश्वचषकाला १०० दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. दोन दिवसांपूर्वी आयसीसीने विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर प्रत्येकजण सामना पाहायला जाण्यासाठी प्लॅनिंग करत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हायहोल्टेज सामन्यासाठी तर आतापासूनच बुकिंग सुरू झाली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने