Bhide Guruji: संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, पण फडणवीस म्हणाले....

पुणे: शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. १५ ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत त्यांनी १५  ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी फाळणी झाली होती, असे धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (State Home Minister Devendra Fadanvis) यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.


पुण्यातील (Pune) दिघी येथील जाहीर व्याख्यान्यात त्यांनी हे वक्तव्य केले. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते १८९८ ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा. भारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्विकारला जात नाही,  तोपर्यंत शांत बसायंच नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाई सारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल,  असे भिडे म्हणाले.



देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?


दरम्यान, यावर भारताला राजकीय स्वातंत्र्य १५  ऑगस्ट १९४७  लाच मिळालेले आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात हे शल्य आहे की भारताची फाळणी झाली, विभागणी झाली. आपल्याला अखंड भारत पाहायचा आहे. अखंड भारत होईल, तेव्हाच समाधान होणार आहे. पण याचा अर्थ १५  ऑगस्ट १९४७ भारताचा स्वातंत्र्य दिवस नाही,  हे त्या अर्थाने कुणी म्हणत असेल तर योग्य नाही. तोच आपला स्वातंत्र दिवस आहे,  असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Pune: धक्कादायक! पुण्यात महिलेची गर्भाशयाची गाठ काढण्याऐवजी डॉक्टरांनी...

पुणे: पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Nagpur Blast : काटोलमध्ये स्फोटक कारखान्यात भीषण दुर्घटना; १२ ठार, १५ जखमी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत १ मार्च रविवारी सकाळी सुमारे ७

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. व्यंकट बापुराव धुमाळे, शेळगाव

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित