Victims of rain : रेल्वे स्थानकात साचलेल्या पाण्यामुळे महिलेचा शॉकने मृत्यू!

Share

नवी दिल्ली : पहिल्याच पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले आणि महापालिकेच्या सफाईची पोलखोल झाली. अशातच रेल्वेच्या गलथानपणामुळे नवी दिल्लीतही पावसामुळे रेल्वे स्थानकात साचलेल्या पाण्यात वीजेचा प्रवाह उतरल्याने एका महिलेला (Victims of rain) आपला जीव गमवावा लागला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी अहुजा नावाची महिला तिच्या पतीसोबत ट्रेनने जाणार होती. त्यासाठी ती रेल्वे स्टेशनवर गेली. दिल्ली रेल्वे स्थानकात पावसामुळे विद्युत तारा साचलेल्या पाण्यात बुडाल्या होत्या. त्यामध्ये विद्युत प्रवाह चालू होता. या विजेचा धक्का लागून साक्षी अहुजाचा मृत्यू झाला.

साक्षी आहुजा नावाची महिला पहाटे साडेपाच वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. तिच्यासोबत आणखी दोन महिला आणि तीन मुले होती. साक्षीला चंदीगडला जायचे होते. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पाण्यातून चालत असताना तोल जाऊ नये म्हणून त्या महिलेने विजेचा खांब पकडला. त्यामुळे महिलेला विजेचा धक्का बसला. त्यानंतर उपस्थित लोकांनीही महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, साक्षीसोबतची तिची नातेवाईक असलेल्या माधवी चोप्रा या महिलेने संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी एसआय नसीब चौहान यांच्याकडे तपास सोपवला असून पुढील तपास सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

58 minutes ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

1 hour ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

1 hour ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

1 hour ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

2 hours ago

संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…

2 hours ago