Accident: रत्नागिरी हादरले! दापोलीत वाहनाचा झाला चक्काचूर, चिमुकल्यांवर काळाचा घाला

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात दापोली (Dapoli) हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास ट्रक व मॅजिक प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघात (Fatal accident) काहीजण जखमी झाले आहेत.


ट्रक आणि मॅजिकच्या भीषण अपघातातील मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. या अपघातात हर्णै येथील प्रवासी मॅजिक गाडीचालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली असून प्रथमदर्शनी ट्रक चालकाच्या चुकीमुळे चार जणांना जीव गमवावा लागल्याचा अंदाज आहे.


अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघात जिथं झाला तिथं स्थानिकांसह वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. काही जखमी प्रवाशांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर काही प्रवाशांना पुढील उपचार करता पाठवण्यात आले आहे.


मरियम गौफिक काझी ६ वर्षे, स्वरा संदेश कदम ८ वर्षे, संदेश कदम, ५५ वर्ष, अनिल सारंग ४५ वर्षं, फराह तौफिक काझी, २७ वर्ष अशी मृतांची नावे आहेत.



जखमींची यादी


१) विनायक हशा चौगुले-४५ पाजपंढरी
२) श्रध्दा संदेश कदम-१४ अडखळ
३) मिरा महेश बोरकर-२२ पाडले
४) भुमी सावंत-१७ हर्णे (मुंबई ट्रान्सफर)
५) मुग्धा सावंत-१४ हर्णे (मुंबई ट्रान्सफर)
६)वंदना चोगले-३८ पाजपंढरी
७)ज्योती चोगले-०९पाजपंढरी
८)विनोद चोगले-३० पाजपंढरी



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!