Shrikant shinde : ही युती वेगळ्या विचारांची, 'त्यांना' नाही कळणार

नाव न उच्चारता श्रीकांत शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा


कल्याण : 'सरकार बनणार हे एकनाथ शिंदेसाहेबांना (Eknath Shinde) माहित नव्हतं. मविआतील (MVA) काही गोष्टी पटल्या नाहीत म्हणून बंड केले. गेल्या ११ महिन्यात या सरकारच्या माध्यमातून जितकी कामं झाली तेवढी याआधी कधी झाली असतील असं मला वाटत नाही.' असं म्हणत शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी विरोधकांना सुनावले आहे. कल्याणमध्ये भरलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. या दरम्यान त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला.

श्रीकांत शिंदे म्हणाले, बाहेर काही लोक सतत खोके खोके असं गाणं लावून आहेत, पण शिंदेसाहेबांनी निधीच्या स्वरुपात खोके दिले. आमची कधी 'त्यांच्यासारखी' वाताहत झाली नाही. रोज कितीतरी कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांना सोडून जात आहेत. पण आमच्याकडे आलेला कुणी परत त्यांच्याकडे गेला आहे का? कारण शिंदेसाहेबांवर लोकांचा विश्वास आहे, असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊतांना लक्ष्य केले.
आधीचे मुख्यमंत्री गाडी चालवत पंढरपूरला पोहोचायचे

शिंदेसाहेब दिवसरात्र तळागाळातल्या लोकांजवळ पोहोचून त्यांच्यासाठी काम करत आहेत. पण ते एक दिवस हेलिकॉप्टरने गावी गेले तर त्याच्या लगेच बातम्या करण्यात आल्या. ते मुख्यमंत्री आहेत म्हणून वेळ वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरने गेले, कारण मुख्यमंत्र्यासाठी एकेक क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो, त्यामुळे ते गाडी चालवत थोडीच जाणार? आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे खूप वेळ होता, ते गाडी चालवत चालवत पंढरपूरला पोहोचायचे, असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
ही युती वेगळ्या विचारांची

विरोधकांकडून शिवसेनेच्या जाहिरात वादामुळे होणार्‍या टीकांवर श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. खालच्या स्तरावर होणाऱ्या गोष्टींमुळे एवढ्या मोठ्या युतीवर (BJP Shivsena alliance) परिणाम होत नाही. ही युती वेगळ्या विचाराने झाली आहे. एका विचाराने, एका उद्देशाने तयार झालेल्या युतीत इतक्या किरकोळ कारणाने वितुष्ट येणार नाही. या युतीत माझं काय, तुमचं काय या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या जनतेला काय हवंय, महाराष्ट्राचं हित कशात आहे, हे समोर ठेवलं जातं.

 
Comments
Add Comment

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी; शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा जाहीर पाठिंबा

मुंबई: राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय

Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला वेग; १७ वर्षांचा आर्थिक लेखाजोखा मागवला

मुंबई : शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी सुरू

महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू?

राज्य निवडणूक आयोगाची आज आयुक्तांसोबत बैठक २७ महानगरांचे सोपे गणित, ५०% आरक्षणात जिल्हा परिषदा

Digital 7/12 in Just 15 Rupees : बावनकुळेंचा 'मास्टरस्ट्रोक'! डिजिटल ७/१२ ला कायदेशीर कवच; अवघ्या १५ रुपयांत डाऊनलोड करा अधिकृत उतारा, GR वाचा...

मुंबई : महसूल विभागात डिजिटल क्रांती घडवत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एका धडाकेबाज