‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मार्ग बदलल्याने गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीला धोका

सौराष्ट्र आणि कच या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर


हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा


पुणे : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने आपला मार्ग गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीकडे वळवला आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने हे चक्रीवादळ आता गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ आणखी १० दिवस लांबणार असल्याचीही शक्यता आहे.


बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व मध्य अरबी समुद्रावर ११ जून रोजी रात्री साडेअकरा वाजता अक्षांश १८.९N आणि लांब ६७.७E जवळ होते. हे चक्रीवादळ १५ जूनच्या दुपारपर्यंत मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान धडकण्याची शक्यता हवामान विभागाने ट्टिटद्वारे दिली होती.





आज सोमवारी सकाळी साडेपाच वाजता हे चक्रीवादळ अक्षांश १९.२N आणि लांब ६७.७E जवळ होते. यामुळे ते १५ जून रोजी दुपारी गुजरातमधील जकाऊ पोर्ट येथे धडकणार असल्याने हवामान विभागाने सौराष्ट्र आणि कच या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.


काही दिवसांपासून ग्लोबल वार्मिंगमुळे अरबी समुद्रावरील चक्रीवादळ वारंवार रौद्र रुप धारण करीत असल्याचे हवामान तज्ज्ञांसमोर आले होते. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे १० दिवसानंतर ६ जून रोजी चक्रीवादळात रुपांतर झाले. हे चक्रीवादळ मोखा चक्रीवादळानंतरचे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असून ते अलीकडच्या दशकात भारतावर प्रभाव टाकणारे आणि सर्वात दीर्घकाळ टिकणारे चक्रीवादळ ठरणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून मिळाली. हे चक्रीवादळ मोखा चक्रीवादळानंतरचे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात