‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मार्ग बदलल्याने गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीला धोका

सौराष्ट्र आणि कच या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर


हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा


पुणे : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने आपला मार्ग गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीकडे वळवला आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने हे चक्रीवादळ आता गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ आणखी १० दिवस लांबणार असल्याचीही शक्यता आहे.


बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व मध्य अरबी समुद्रावर ११ जून रोजी रात्री साडेअकरा वाजता अक्षांश १८.९N आणि लांब ६७.७E जवळ होते. हे चक्रीवादळ १५ जूनच्या दुपारपर्यंत मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान धडकण्याची शक्यता हवामान विभागाने ट्टिटद्वारे दिली होती.





आज सोमवारी सकाळी साडेपाच वाजता हे चक्रीवादळ अक्षांश १९.२N आणि लांब ६७.७E जवळ होते. यामुळे ते १५ जून रोजी दुपारी गुजरातमधील जकाऊ पोर्ट येथे धडकणार असल्याने हवामान विभागाने सौराष्ट्र आणि कच या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.


काही दिवसांपासून ग्लोबल वार्मिंगमुळे अरबी समुद्रावरील चक्रीवादळ वारंवार रौद्र रुप धारण करीत असल्याचे हवामान तज्ज्ञांसमोर आले होते. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे १० दिवसानंतर ६ जून रोजी चक्रीवादळात रुपांतर झाले. हे चक्रीवादळ मोखा चक्रीवादळानंतरचे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असून ते अलीकडच्या दशकात भारतावर प्रभाव टाकणारे आणि सर्वात दीर्घकाळ टिकणारे चक्रीवादळ ठरणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून मिळाली. हे चक्रीवादळ मोखा चक्रीवादळानंतरचे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.