‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मार्ग बदलल्याने गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीला धोका

सौराष्ट्र आणि कच या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर


हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा


पुणे : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने आपला मार्ग गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीकडे वळवला आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने हे चक्रीवादळ आता गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ आणखी १० दिवस लांबणार असल्याचीही शक्यता आहे.


बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व मध्य अरबी समुद्रावर ११ जून रोजी रात्री साडेअकरा वाजता अक्षांश १८.९N आणि लांब ६७.७E जवळ होते. हे चक्रीवादळ १५ जूनच्या दुपारपर्यंत मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान धडकण्याची शक्यता हवामान विभागाने ट्टिटद्वारे दिली होती.





आज सोमवारी सकाळी साडेपाच वाजता हे चक्रीवादळ अक्षांश १९.२N आणि लांब ६७.७E जवळ होते. यामुळे ते १५ जून रोजी दुपारी गुजरातमधील जकाऊ पोर्ट येथे धडकणार असल्याने हवामान विभागाने सौराष्ट्र आणि कच या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.


काही दिवसांपासून ग्लोबल वार्मिंगमुळे अरबी समुद्रावरील चक्रीवादळ वारंवार रौद्र रुप धारण करीत असल्याचे हवामान तज्ज्ञांसमोर आले होते. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे १० दिवसानंतर ६ जून रोजी चक्रीवादळात रुपांतर झाले. हे चक्रीवादळ मोखा चक्रीवादळानंतरचे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असून ते अलीकडच्या दशकात भारतावर प्रभाव टाकणारे आणि सर्वात दीर्घकाळ टिकणारे चक्रीवादळ ठरणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून मिळाली. हे चक्रीवादळ मोखा चक्रीवादळानंतरचे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

एनआयए प्रमुख सदानंद दाते होणार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत अतिरेकी हल्ला केला होता. या

Bangladesh High Commission Protests Delhi : हिंदूंवरील अत्याचाराचे दिल्लीत तीव्र पडसाद; संतप्त हिंदू संघटनांचा बांगलादेशी उच्चायुक्तालयावर धडक मोर्चा

नवी दिल्ली : शेजारील देश बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण हिंसाचाराचे आणि हिंदू

Digital Fraud News : ८ कोटींची फसवणूक, १२ पानांची चिठ्ठी अन् स्वतःवर गोळी; माजी IPS अमर सिंग चहल यांचा आत्महत्येचा प्रयत्न

पटियाला : पंजाबमधील एक धक्कादायक घटना समोर आली असून, राज्याचे माजी आयपीएस (IPS) अधिकारी अमर सिंग चहल यांनी स्वतःवर

२०२५ मध्ये जनरेशन झेडने आणला पर्यटनाचा नवा ट्रेंड

प्रवास बुकिंगमध्ये वाढ; क्लीअरट्रिपचा वर्षअखेरीचा अहवाल नवी दिल्ली : २०२५ मध्ये भारतीयांच्या प्रवासाच्या सवयी

प्रदूषण प्रमाणपत्र नाही, तर पेट्रोल नाही…

राज्य सरकारचे पेट्रोल पंपांना कडक आदेश ओडिसा : भारतातील वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून ओडिशा सरकारने महत्वाचा

अरावली पर्वतरांगेतील ९० टक्के क्षेत्र संरक्षित

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून सरकारची भूमिका स्पष्ट नवी दिल्ली : राजस्थानमधील अरावली