खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

Share

भात १४३, ज्वारी २३५ तर मूग आणि तिळाच्या हमीभावात ८०० रुपयांची वाढ जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) : केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान हमीभाव किमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये भाताच्या किमान हमीभावामध्ये १४३ रुपयांची वाढ केली आहे, तर ज्वारीच्या किमान हमीभावामध्ये २१०रुपयांची वाढ करण्यात आली आहे. भात पिकाच्या किमान हमीभावामध्ये वाढ होऊन आता ती २१८३ रुपये करण्यात आली आहे, तर ज्वारीचा किमान हमीभाव आता २३५ वर पोहोचला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिह तोमर यांनी व्यक्त केली.

देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच जास्तीत जास्त प्रदेश कृषी पिकाखाली यावा यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, कृषी खर्च आणि किमती आयोगाकडून वेळोवेळी येणाऱ्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खरीप पिकांसाठी सर्वाधिक किमान हमीभाव जाहीर करण्यात आला आहे आणि त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे.

कोणत्या पिकांना किती हमीभाव?

भात – २१८३रुपये – १४३ रुपयांची वाढ
ज्वारी – ३१८० रुपये – १४३ रुपयांची वाढ
ज्वारी मालदांडी – ३२२५ रुपये – २३५ रुपयांची वाढ
रागी – ३८४६- २६८ रुपयांची वाढ
तूर – ७००० रुपये – ४०० रुपयांची वाढ
सोयाबीन – ४६०० रुपये – ३०० रुपयांची वाढ
मूग – ८५५८ रुपये – ८०३ रुपयांची वाढ
तिळ – ८६३५ रुपये – ८०५ रुपयांची वाढ

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

3 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

3 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

4 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

4 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

5 hours ago