लोड टेस्टींगसाठी गुरुवार पासून तीन दिवस साळाव पूल पुर्णपणे बंद

  432

अतिअवजड वाहतुकीमुळे होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने निर्णय


मुरूड : मुरूड - अलिबाग तालुक्यांना जोडणाऱ्या रेवदंडा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या पुलावरून पाच टन वजनावरील वाहनांना यापूर्वीच बंदी घातली होती. मात्र आता महत्त्वाच्या भागाची दुरुस्ती सुरू झाल्याने पुलाला हानी पोहोचू नये, याकरता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी गुरुवार ८ जूनपासून तीन दिवसांसाठी पूल बंद असणार आहे.


अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाबाबत प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावानुसार रेवदंडा - साळाव पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल कमकुवत झाल्यास होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने, तसेच पुलाची पुनर्बांधणी व लोड टेस्टिंगचे काम करण्यासाठी रेवदंडा- साळाव पूल पुढील २० दिवसांसाठी बंद राहील. पुलावरून ५ टन वजनावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत. मात्र लोड टेस्टिंगच्या कामामुळे सर्व प्रकारची वाहतूक ८ ते १० जून या तीन दिवसांदरम्यान बंद करण्यात आली आहे.


अलिबाग ते साळाव दरम्यान होणा-या अवजड वाहनाच्या वाहतुकीसाठी अलिबाग -पोयनाड - वडखळ - नागोठणे - कोलाड - साळाव असा पर्यायी मार्ग आहे. तसेच दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग - बेलकडे - वावे - सुडकोली - रोहा - तळेखार - साळावमार्गे आहे. मुरूड - अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूकीसाठी मुरूड - साळाव - तळेखार -चणेरा - रोहा - कोलाड - नागोठणे - वडखळ - पोयनाड - अलिबाग या पर्यायी मार्गाचा वापर होऊ शकतो.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी