लोड टेस्टींगसाठी गुरुवार पासून तीन दिवस साळाव पूल पुर्णपणे बंद

अतिअवजड वाहतुकीमुळे होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने निर्णय


मुरूड : मुरूड - अलिबाग तालुक्यांना जोडणाऱ्या रेवदंडा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या पुलावरून पाच टन वजनावरील वाहनांना यापूर्वीच बंदी घातली होती. मात्र आता महत्त्वाच्या भागाची दुरुस्ती सुरू झाल्याने पुलाला हानी पोहोचू नये, याकरता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी गुरुवार ८ जूनपासून तीन दिवसांसाठी पूल बंद असणार आहे.


अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाबाबत प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावानुसार रेवदंडा - साळाव पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल कमकुवत झाल्यास होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने, तसेच पुलाची पुनर्बांधणी व लोड टेस्टिंगचे काम करण्यासाठी रेवदंडा- साळाव पूल पुढील २० दिवसांसाठी बंद राहील. पुलावरून ५ टन वजनावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत. मात्र लोड टेस्टिंगच्या कामामुळे सर्व प्रकारची वाहतूक ८ ते १० जून या तीन दिवसांदरम्यान बंद करण्यात आली आहे.


अलिबाग ते साळाव दरम्यान होणा-या अवजड वाहनाच्या वाहतुकीसाठी अलिबाग -पोयनाड - वडखळ - नागोठणे - कोलाड - साळाव असा पर्यायी मार्ग आहे. तसेच दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग - बेलकडे - वावे - सुडकोली - रोहा - तळेखार - साळावमार्गे आहे. मुरूड - अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूकीसाठी मुरूड - साळाव - तळेखार -चणेरा - रोहा - कोलाड - नागोठणे - वडखळ - पोयनाड - अलिबाग या पर्यायी मार्गाचा वापर होऊ शकतो.

Comments
Add Comment

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील