लोड टेस्टींगसाठी गुरुवार पासून तीन दिवस साळाव पूल पुर्णपणे बंद

अतिअवजड वाहतुकीमुळे होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने निर्णय


मुरूड : मुरूड - अलिबाग तालुक्यांना जोडणाऱ्या रेवदंडा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या पुलावरून पाच टन वजनावरील वाहनांना यापूर्वीच बंदी घातली होती. मात्र आता महत्त्वाच्या भागाची दुरुस्ती सुरू झाल्याने पुलाला हानी पोहोचू नये, याकरता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी गुरुवार ८ जूनपासून तीन दिवसांसाठी पूल बंद असणार आहे.


अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाबाबत प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावानुसार रेवदंडा - साळाव पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल कमकुवत झाल्यास होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने, तसेच पुलाची पुनर्बांधणी व लोड टेस्टिंगचे काम करण्यासाठी रेवदंडा- साळाव पूल पुढील २० दिवसांसाठी बंद राहील. पुलावरून ५ टन वजनावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत. मात्र लोड टेस्टिंगच्या कामामुळे सर्व प्रकारची वाहतूक ८ ते १० जून या तीन दिवसांदरम्यान बंद करण्यात आली आहे.


अलिबाग ते साळाव दरम्यान होणा-या अवजड वाहनाच्या वाहतुकीसाठी अलिबाग -पोयनाड - वडखळ - नागोठणे - कोलाड - साळाव असा पर्यायी मार्ग आहे. तसेच दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग - बेलकडे - वावे - सुडकोली - रोहा - तळेखार - साळावमार्गे आहे. मुरूड - अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूकीसाठी मुरूड - साळाव - तळेखार -चणेरा - रोहा - कोलाड - नागोठणे - वडखळ - पोयनाड - अलिबाग या पर्यायी मार्गाचा वापर होऊ शकतो.

Comments
Add Comment

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी