सांगली जिल्ह्यात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा दरोडा

रिलायन्स ज्वेल्स शोरुममधून तब्बल १४ कोटींचे दागिने लंपास


सांगली : सांगली जिल्ह्यात मिरज येथे मार्केट यार्ड चौकावरील रिलायन्स ज्वेल्स शोरुममध्ये काल दुपारी तीनच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. भरदिवसा पडलेल्या या दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यात दरोडेखोरांनी सोन्याचे व हिर्‍याचे तब्बल १४ कोटींचे दागिने लंपास केले. हे दरोडेखोर परराज्याचे असल्याची माहिती मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा दरोडा आहे.


घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि तपासाला सुरुवात केली. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दरोडेखोरांची टोळी पकडण्यात अजून यश आलेले नाही. पोलिसांची सात पथके यासाठी तयार करण्यात आली आहेत. इतर जिल्ह्यांतील पोलिसांचीदेखील या कामी मदत घेतली जात आहे.


या घटनेत सुरुवातीला ४ ते ५ जण ग्राहक असल्याचे सांगत रिलायन्स ज्वेल्स शोरुममध्ये गेले. त्यांनी सगळ्या कर्मचार्‍यांना एकत्रित करुन त्यांचे हातपाय बांधले. मॅनेजरलाही धमकावण्यात आले. त्यातील दोन कर्मचार्‍यांना दागिने पिशवीत भरण्यास सांगितले. त्यानंतर हे दरोडेखोर शोरुमच्या बाहेर निघताना आत जाणार्‍या काही ग्राहकांसोबत त्यांची झटापट झाली आणि गोळीबारदेखील झाला. यात एका ग्राहकाने शोरुमच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता तो जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.


हे चोरटे दोन गाड्यांमधून पळाल्याचे समजत आहे, त्यामुळे साधारण ८ ते १० जणांची टोळी असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. अजून या घटनेसंदर्भात सविस्तर धागेदोरे हाती लागलेले नसले तरी ही टोळी परराज्यातूनच आलेली असावी असा पोलिसांचा दाट निष्कर्ष आहे.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री