सांगली जिल्ह्यात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा दरोडा

रिलायन्स ज्वेल्स शोरुममधून तब्बल १४ कोटींचे दागिने लंपास


सांगली : सांगली जिल्ह्यात मिरज येथे मार्केट यार्ड चौकावरील रिलायन्स ज्वेल्स शोरुममध्ये काल दुपारी तीनच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. भरदिवसा पडलेल्या या दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यात दरोडेखोरांनी सोन्याचे व हिर्‍याचे तब्बल १४ कोटींचे दागिने लंपास केले. हे दरोडेखोर परराज्याचे असल्याची माहिती मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा दरोडा आहे.


घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि तपासाला सुरुवात केली. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दरोडेखोरांची टोळी पकडण्यात अजून यश आलेले नाही. पोलिसांची सात पथके यासाठी तयार करण्यात आली आहेत. इतर जिल्ह्यांतील पोलिसांचीदेखील या कामी मदत घेतली जात आहे.


या घटनेत सुरुवातीला ४ ते ५ जण ग्राहक असल्याचे सांगत रिलायन्स ज्वेल्स शोरुममध्ये गेले. त्यांनी सगळ्या कर्मचार्‍यांना एकत्रित करुन त्यांचे हातपाय बांधले. मॅनेजरलाही धमकावण्यात आले. त्यातील दोन कर्मचार्‍यांना दागिने पिशवीत भरण्यास सांगितले. त्यानंतर हे दरोडेखोर शोरुमच्या बाहेर निघताना आत जाणार्‍या काही ग्राहकांसोबत त्यांची झटापट झाली आणि गोळीबारदेखील झाला. यात एका ग्राहकाने शोरुमच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता तो जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.


हे चोरटे दोन गाड्यांमधून पळाल्याचे समजत आहे, त्यामुळे साधारण ८ ते १० जणांची टोळी असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. अजून या घटनेसंदर्भात सविस्तर धागेदोरे हाती लागलेले नसले तरी ही टोळी परराज्यातूनच आलेली असावी असा पोलिसांचा दाट निष्कर्ष आहे.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना