ओडिशा : कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले. या अपघाताच्या ५१ तासाच्या मदत व बचाव कार्यानंतर आता दोन्ही ट्रॅक पूर्ववत करण्यात आले आहेत.
रेल्वे वाहतूक सुरू होताच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हात जोडले. तसेच रेल्वेमंत्र्यांनी घटनास्थळी तैनात कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी वैष्णव यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.