राज्यात दिवसभरात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

पुणे: मान्सून अद्याप राज्यात दाखल झालेला नसला तरी राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, वाशिम, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली.


दरम्यान, भुसावळ शहरात जोरदार वादळामुळे एका इमरातीच्या सहाव्या मजल्यावरील भिंत कोसळल्याची घटना घडली. सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले.


दुपारी बारा वाजल्या नंतर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी परिसरात अनेक साहित्य उडाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. तसेच शहरात आठवडा बाजार असल्याने शेतीमाल विकण्यास आलेल्या शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी