देशातील ४० वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द तर १०० रडारवर

  157

नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) देशभरातील ४० वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने हा कठोर निर्णय घेतला आहे. तसेच १०० वैद्यकीय महाविद्यालयांना नोटिसा बजावून त्रुटी दूर करण्यास सांगितल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक प्रणालीवर हजेरी न नोंदवण्यापासून ते कॉलेजच्या सुरक्षा यंत्रणेपर्यंतची बाब समोर आली आहे.


चेन्नईतील सर्वात जुन्या सरकारी वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या स्टॅनले मेडिकल कॉलेज आणि राज्यातील इतर काही वैद्यकीय महाविद्यालयांनी आपली मान्यता गमावल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार ज्या महाविद्यालयांना संलग्नीकरण रद्द करण्यात आले आहे किंवा त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यांच्याकडे बायोमेट्रिक हजेरी प्रणाली होती. कोविड-19 नंतर कर्मचाऱ्यांनी दररोज हजेरी लावणे सुरू केले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमिळनाडू, गुजरात, आसाम, पंजाब, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील अनेक महाविद्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Comments
Add Comment

IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला