देशातील ४० वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द तर १०० रडारवर

नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) देशभरातील ४० वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने हा कठोर निर्णय घेतला आहे. तसेच १०० वैद्यकीय महाविद्यालयांना नोटिसा बजावून त्रुटी दूर करण्यास सांगितल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक प्रणालीवर हजेरी न नोंदवण्यापासून ते कॉलेजच्या सुरक्षा यंत्रणेपर्यंतची बाब समोर आली आहे.


चेन्नईतील सर्वात जुन्या सरकारी वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या स्टॅनले मेडिकल कॉलेज आणि राज्यातील इतर काही वैद्यकीय महाविद्यालयांनी आपली मान्यता गमावल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार ज्या महाविद्यालयांना संलग्नीकरण रद्द करण्यात आले आहे किंवा त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यांच्याकडे बायोमेट्रिक हजेरी प्रणाली होती. कोविड-19 नंतर कर्मचाऱ्यांनी दररोज हजेरी लावणे सुरू केले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमिळनाडू, गुजरात, आसाम, पंजाब, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील अनेक महाविद्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी मिझोरम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

मिझोरम, मणिपूर आणि आसाममध्ये ३५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे उद्घाटन करणार प. बंगाल आणि बिहारमध्ये

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

सावधान! आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्यांना अलर्ट जारी; मोठं संकट येणार की साथरोग?

पुरामुळे वाढतेय साथरोगाची भीती: आरोग्य मंत्रालयाचा सर्व राज्यांना 'हाय अलर्ट' जारी, डेंग्यू आणि मलेरियाचा धोका

माधुरी हत्ती प्रकरण : कोल्हापूरला पाठवण्यावर तुर्तास निर्णय नाही

प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्याबाबत सर्वांचे एकमत नवी दिल्ली : कोल्हापूर

Nepal News : भारतीय पर्यटकांवर नेपाळमध्ये हल्ला; प्रवाशांचे मोबाईल-रोख रक्कम लुटली अन् सर्वांना तातडीनं...

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही

सी. पी. राधाकृष्णन झाले भारताचे १५ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींनी दिली शपथ

नवी दिल्ली : भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ घेतली. दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे