२०१४ ते २०२३ भारताचा सुवर्णकाळ!

नितेश राणे आणि निलेश राणे यांनी घेतला मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा


कणकवली : आज भाजप आमदार नितेश राणे आणि भाजप नेते निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला. ते म्हणाले, २०१४ ते २३ पर्यंत मोदीसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताने सुवर्णकाळ अनुभवला. भारताची प्रतिमा आज जगामध्ये महासत्ताक होण्याच्या दिशेने जाणारा देश, संकटकाळात विविध देशांना मदत करणारा देश अशी नवीन ओळख तयार केली आहे, असं नितेश राणे म्हणालेत.


काँग्रेसच्या काळात देशाची एक वेगळी प्रतिमा होती. भ्रष्टाचाराने बरबटलेला देश अशी तेव्हा ओळख होती. ती ओळख आता पुसली गेली आहे. महासत्ताक होण्याच्या दिशेने जाणारा देश अशी ओळख सध्या भारताची होते आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असं नितेश राणे म्हणाले.


शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, बेरोजगारांना त्यांचा मान देणं,सन्मान देणं हे या सरकारनं केलं आहे. काँग्रेस सरकारच्या काळात योजना जाहीर व्हायच्या पण योजनांचा पैसा लालफितीतच अडकून पडायच्या. आर्थिक समृद्धी दारात आणण्याचं काम मोदी सरकारच्या हातून झालेलं आहे.


२०१४ च्या अगोदर रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो मच्छीमारांसाठी चुकून प्रस्ताव यायचे. पण आता मुंबई गोवा महामार्गाचा विकास झाला. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येऊ शकले. मुद्रा योजना, पंतप्रधान आवास योजनाचे मोठ्या संख्येने देशात लाभार्थी झाले आहेत


सबका साथ, सबका विकास या घोषणेमुळे धार्मिक स्थळांचा विकास करण्यात आला. ना खाऊंगा ना खाणे दूँगा यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. कोरोना काळात विविध देश संघर्ष करत होते तेव्हा व्हेक्सींन पाठवून देशाला सन्मान मिळवून दिला. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन पंतप्रधान मोदींचा ऑटोग्राफ घेण्यासाठी पुढे आले. जगभरात भारताची प्रतिमा बदलली आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी मोदी सरकारच्या कामकाजावर प्रकाश टाकला.



निलेश राणे म्हणाले…


निलेश राणे यांनी त्यांच्या विरोधी पक्षांवर विशेषत: शरद पवार यांचा समाचार घेतला. विरोधी पक्ष एकत्र आले तरी २०२४ ला काही फरक पडणार नाही. शरद पवार केंद्रासाठी नेहमी आघाडी करतात. पण काही होत नाही. काँग्रेसमध्ये केंद्रीयमंत्री असताना ही शरद पवारांनी असा प्रयोग केला होता. विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याला गांभीर्याने घेऊ नका, असा टोला निलेश राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.