'पीएम मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित'- अमित शाह

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात पक्षाकडून या ९ वर्षांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी मोदी सरकारच्या ९ वर्षातील कामगिरीची माहिती दिली. मोदी सरकारची ९ वर्षे सुरक्षा आणि राष्ट्रीय अभिमानाची वर्षे असल्याचे वर्णन करताना शाह म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली आज देश सुरक्षित आहे.


अमित शाह यांनी ट्विट करून लिहिले की, मोदी सरकारची ९ वर्षे सुरक्षा, राष्ट्रीय अभिमान, विकास आणि गरीब कल्याण यांच्या अभूतपूर्व संयोजनाची ९ वर्षे आहेत. आज एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे आणि जगात अभिमानाचे नवे आयाम निर्माण करत आहे, तर दुसरीकडे सरकारने विकासाचे आणि गरिबांच्या कल्याणाचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.





शाह यांनी पुढे म्हटले आहे की, नरेंद्र मोदींनी घर, वीज, गॅस आणि आरोग्य विमा यासारख्या अनेक मूलभूत सुविधा देऊन गरीबांचे जीवनमान उंचावले आहे. हा वर्ग प्रथमच देशाच्या विकासाच्या प्रवासाशी स्वत:ला जोडलेला वाटत आहे. देशाने पहिल्यांदाच ग्रामीण आणि शहरी भारताचा समांतर विकास पाहिला आहे.


कोरोना महामारीच्या प्रभावातून अनेक विकसित देश अद्याप बाहेर आलेले नसताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था जगासमोर आदर्श ठरली आहे. आधुनिकता आणि सांस्कृतिक वारसा एकत्र घेऊन नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारतासाठी दृढनिश्चयी भावनेने काम करत आहेत.

Comments
Add Comment

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडच्या राजधानीत ढगफूटी! घरं, गाड्या आणि दुकाने खेळण्यांसारख्या गेल्या वाहून

डेहराडून: उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीने कहर केला आहे. उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडून येथील

Google Gemini Nano Banana AI trend : मुलींनो सावधान! गुगल जेमिनाय’मध्ये फोटो करताय? IPS अधिकाऱ्याने दिला धक्कादायक इशारा, नक्की वाचा

‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फीचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी आपले फोटो

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार