'पीएम मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित'- अमित शाह

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात पक्षाकडून या ९ वर्षांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी मोदी सरकारच्या ९ वर्षातील कामगिरीची माहिती दिली. मोदी सरकारची ९ वर्षे सुरक्षा आणि राष्ट्रीय अभिमानाची वर्षे असल्याचे वर्णन करताना शाह म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली आज देश सुरक्षित आहे.


अमित शाह यांनी ट्विट करून लिहिले की, मोदी सरकारची ९ वर्षे सुरक्षा, राष्ट्रीय अभिमान, विकास आणि गरीब कल्याण यांच्या अभूतपूर्व संयोजनाची ९ वर्षे आहेत. आज एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे आणि जगात अभिमानाचे नवे आयाम निर्माण करत आहे, तर दुसरीकडे सरकारने विकासाचे आणि गरिबांच्या कल्याणाचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.





शाह यांनी पुढे म्हटले आहे की, नरेंद्र मोदींनी घर, वीज, गॅस आणि आरोग्य विमा यासारख्या अनेक मूलभूत सुविधा देऊन गरीबांचे जीवनमान उंचावले आहे. हा वर्ग प्रथमच देशाच्या विकासाच्या प्रवासाशी स्वत:ला जोडलेला वाटत आहे. देशाने पहिल्यांदाच ग्रामीण आणि शहरी भारताचा समांतर विकास पाहिला आहे.


कोरोना महामारीच्या प्रभावातून अनेक विकसित देश अद्याप बाहेर आलेले नसताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था जगासमोर आदर्श ठरली आहे. आधुनिकता आणि सांस्कृतिक वारसा एकत्र घेऊन नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारतासाठी दृढनिश्चयी भावनेने काम करत आहेत.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे