पर्यटकांनी बहरले काशिद बीच

मुरूड : मुरूडमधील काशिद बीचवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटकांची अलोट गर्दी उसळलेली पहायला मिळत आहे. रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा तर नांदगाव बाजारपेठेत वाहनांची कोंडी झाली होती. पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला.



काशिद-बिच हे मुरूड तालुक्यातील एक रमणीय स्थळ आहे. विस्तीर्ण समुद्र किनारा, भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरील शुभ्र वाळू पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटकांसाठी येथे स्पीडबोट, पॅरेसेलिंगबोट, बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील उपलब्ध आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येथील स्पिडबोट बंद करण्यात आल्या आहेत. कारण पावसाळा सुरू होण्याआधी समुद्राला उधाण येते. याठिकाणी खाद्यपदार्थंची रेलचेल आहे. याठिकाणी दर शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्रॅफिक जॅमलाही सामोरे जावे लागते.



स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा!



पांढरी वाळू, निळाशार समुद्रकिनारा, हिरवी पर्वतराजी ही काशीद बीचची वैशिष्ट्ये. दोन टेकड्यांदरम्यानच्या तीन किलोमीटर लांबीच्या या बीचचे पाणी स्वच्छ आहे. पर्यटकांची गजबज असली, तरीही हा समुद्रकिनारा शांत असतो. अलिबागला येणारे जास्तीत जास्त पर्यटक काशीद बीचला भेट देतात. हा बीच गोव्या इतकाच सुंदर आहे. मॉन्सूनव्यतिरिक्तच्या काळात या बीचवर पाचसहा फुटांपर्यंतच्या लाटा उसळतात. पुरेशी सावधगिरी न बाळगता सर्फिंग करू नये. गाईड किंवा स्थानिकांच्या मार्गदर्शनाशिवास सर्फिंगचे धाडस करू नये. पावसाळ्यात येथील समुद्रकिनारा खवळलेला असतो. कोकणातील मासे व इतर पारंपरिक पदार्थांचा घरगुती आस्वाद घेता येतो. मुंबईबरोबरच पुण्यापासूनही तो जवळ आहे. या बीचपासून मुरुड जंजिरा किल्ला जवळच असून तुम्ही त्यालाही भेट देऊ शकता.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात