माथेरानमधील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट

माथेरान (प्रतिनिधी) : एप्रिल आणि मे हा कालावधी माथेरानचा मुख्य पर्यटन हंगाम म्हणून ओळखला जातो. परंतु या काळात माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. येथील व्यवसाय हा फक्त शनिवार रविवार वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनासाठी ही धोक्याची घंटा आहे.



मे महिन्यामध्ये २५ तारखेपर्यंत माथेरानमध्ये ५४५६८ प्रौढ ९८७८ मुले असे ऐकून ६४४४६ पर्यटक दाखल झाले. त्यातून नगरपालिकेला २९,७५३५० इतके उत्पन्न मिळाले. ही आकडेवारी पाहता माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये निश्चितच घट झाली असल्याचे समोर आले आहे. माथेरानमध्ये होत असलेला बदल येथील पर्यटनाकरिता मारक ठरत आहे.



पारंपरिक पर्यटन मागे पडत असून अधिकाधिक नफा मिळवण्याच्या नादामध्ये व्यावसायिकांकडून पर्यटकांची फसवणूक होत आहे. पूर्वी दहा ते पंधरा दिवस राहण्याकरता अनेक कुटुंब येत होती. परंतु कालांतराने माथेरानमध्ये काही व्यवसायिकांनी प्रवेश करून येथे पर्यटनापेक्षा अर्थार्जनासाठी अधिक प्राधान्य दिले. त्यानंतर पर्यटक पाठ फिरवू लागले. पूर्वी येथे सहकुटुंब येणारे पारसी व उच्चभ्रू वर्गातील लोक आता या ठिकाणी दिसत नाहीत.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण