माथेरानमधील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट

  169

माथेरान (प्रतिनिधी) : एप्रिल आणि मे हा कालावधी माथेरानचा मुख्य पर्यटन हंगाम म्हणून ओळखला जातो. परंतु या काळात माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. येथील व्यवसाय हा फक्त शनिवार रविवार वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनासाठी ही धोक्याची घंटा आहे.



मे महिन्यामध्ये २५ तारखेपर्यंत माथेरानमध्ये ५४५६८ प्रौढ ९८७८ मुले असे ऐकून ६४४४६ पर्यटक दाखल झाले. त्यातून नगरपालिकेला २९,७५३५० इतके उत्पन्न मिळाले. ही आकडेवारी पाहता माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये निश्चितच घट झाली असल्याचे समोर आले आहे. माथेरानमध्ये होत असलेला बदल येथील पर्यटनाकरिता मारक ठरत आहे.



पारंपरिक पर्यटन मागे पडत असून अधिकाधिक नफा मिळवण्याच्या नादामध्ये व्यावसायिकांकडून पर्यटकांची फसवणूक होत आहे. पूर्वी दहा ते पंधरा दिवस राहण्याकरता अनेक कुटुंब येत होती. परंतु कालांतराने माथेरानमध्ये काही व्यवसायिकांनी प्रवेश करून येथे पर्यटनापेक्षा अर्थार्जनासाठी अधिक प्राधान्य दिले. त्यानंतर पर्यटक पाठ फिरवू लागले. पूर्वी येथे सहकुटुंब येणारे पारसी व उच्चभ्रू वर्गातील लोक आता या ठिकाणी दिसत नाहीत.

Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले