‘आम्ही येथे गांडूळ खत निर्मितीसाठी परवानगी दिली, प्लास्टिक कचरा जाळण्यासाठी नाही’

चिपळूण : आजपर्यंत आपण विविध विषयात आंदोलने आणि निदर्शने होताना पाहत आलो. मात्र खेर्डी कातळवाडीत आंदोलनाचा अभिनव प्रकार समोर आला आहे. १५ वर्षापूर्वी जिल्हा नियोजनमधून ४० लाख खर्च करून खेर्डी ग्रामपंचायतीने गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभा केला. मात्र त्यात खत निर्मिती किती झाली आणि त्याचा उपयोग किती झाला, हा संशोधनाचा विषय असला तरी या प्रकल्पाची जागा वेगळ्याच कारणाने आता चर्चेत आली आहे.



या जागेत प्लास्टिक व इतर कचरा आणून टाकला जातोय. तेच प्लास्टिक गुरे खातात आणि प्लास्टिक जाळले जाते त्याचा आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंध येतोय. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत येथील सुजाण लोकांनी कोणत्याही प्रकारचा चुकीचा मार्ग न अवलंबता ‘आम्ही येथे गांडूळ खत निर्मितीसाठी परवानगी दिली आहे, प्लास्टिक कचरा जाळण्यासाठी नाही’ असा बॅनर त्या ठिकाणी लावला असून साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.



आता खेर्डी ग्रामपंचायत नेमकी काय भूमिका घेत आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. खेर्डी कातळवाडीत १५ वर्षापूर्वी जिल्हा नियोजनमधून ४० लाख खर्च करून खेर्डी ग्रामपंचायतीने गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभा केला होता. तो आज बिकट स्थितीत दिसून येत आहे.

Comments
Add Comment

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी