‘आम्ही येथे गांडूळ खत निर्मितीसाठी परवानगी दिली, प्लास्टिक कचरा जाळण्यासाठी नाही’

  421

चिपळूण : आजपर्यंत आपण विविध विषयात आंदोलने आणि निदर्शने होताना पाहत आलो. मात्र खेर्डी कातळवाडीत आंदोलनाचा अभिनव प्रकार समोर आला आहे. १५ वर्षापूर्वी जिल्हा नियोजनमधून ४० लाख खर्च करून खेर्डी ग्रामपंचायतीने गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभा केला. मात्र त्यात खत निर्मिती किती झाली आणि त्याचा उपयोग किती झाला, हा संशोधनाचा विषय असला तरी या प्रकल्पाची जागा वेगळ्याच कारणाने आता चर्चेत आली आहे.



या जागेत प्लास्टिक व इतर कचरा आणून टाकला जातोय. तेच प्लास्टिक गुरे खातात आणि प्लास्टिक जाळले जाते त्याचा आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंध येतोय. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत येथील सुजाण लोकांनी कोणत्याही प्रकारचा चुकीचा मार्ग न अवलंबता ‘आम्ही येथे गांडूळ खत निर्मितीसाठी परवानगी दिली आहे, प्लास्टिक कचरा जाळण्यासाठी नाही’ असा बॅनर त्या ठिकाणी लावला असून साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.



आता खेर्डी ग्रामपंचायत नेमकी काय भूमिका घेत आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. खेर्डी कातळवाडीत १५ वर्षापूर्वी जिल्हा नियोजनमधून ४० लाख खर्च करून खेर्डी ग्रामपंचायतीने गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभा केला होता. तो आज बिकट स्थितीत दिसून येत आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण