‘आम्ही येथे गांडूळ खत निर्मितीसाठी परवानगी दिली, प्लास्टिक कचरा जाळण्यासाठी नाही’

चिपळूण : आजपर्यंत आपण विविध विषयात आंदोलने आणि निदर्शने होताना पाहत आलो. मात्र खेर्डी कातळवाडीत आंदोलनाचा अभिनव प्रकार समोर आला आहे. १५ वर्षापूर्वी जिल्हा नियोजनमधून ४० लाख खर्च करून खेर्डी ग्रामपंचायतीने गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभा केला. मात्र त्यात खत निर्मिती किती झाली आणि त्याचा उपयोग किती झाला, हा संशोधनाचा विषय असला तरी या प्रकल्पाची जागा वेगळ्याच कारणाने आता चर्चेत आली आहे.



या जागेत प्लास्टिक व इतर कचरा आणून टाकला जातोय. तेच प्लास्टिक गुरे खातात आणि प्लास्टिक जाळले जाते त्याचा आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंध येतोय. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत येथील सुजाण लोकांनी कोणत्याही प्रकारचा चुकीचा मार्ग न अवलंबता ‘आम्ही येथे गांडूळ खत निर्मितीसाठी परवानगी दिली आहे, प्लास्टिक कचरा जाळण्यासाठी नाही’ असा बॅनर त्या ठिकाणी लावला असून साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.



आता खेर्डी ग्रामपंचायत नेमकी काय भूमिका घेत आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. खेर्डी कातळवाडीत १५ वर्षापूर्वी जिल्हा नियोजनमधून ४० लाख खर्च करून खेर्डी ग्रामपंचायतीने गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभा केला होता. तो आज बिकट स्थितीत दिसून येत आहे.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण