वसई-विरार परिसर पावसाळ्यात तुंबण्याची शक्यता

वसई-विरार : एकीकडे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली नालेसफाईच्या कामांनी वेग धरला आहे. तर दुसरीकडे वसई-विरारसारख्या अनेक पावसाळापूर्व कामे पूर्ण होत नसल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या देखरेखीखाली नालेसफाईचे काम बर्‍यापैकी पूर्ण होत आलेले असले तरी कल्व्हर्ट, रस्त्यांची कामे तसेच अन्य कामे पावसाळा अगदी तोंडावर असताना अपूर्ण राहिल्याने वसई-विरारची तुंबई होऊ शकते.


महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून केवळ नालेसफाई नव्हे तर पाणी साचणा-या ठिकाणांचा सर्व्हे करून उपायोजना हाती घेतल्या आहेत.त्यात वसई ,एव्हरशाईन वालीव, चिंचपाडा सनसिटी गास चुळणे मार्ग , नालासोपारा येथील मार्ग तसेच विरार येथे सखल भाग असलेल्या रस्त्याना उंच केले जात आहे जेणेकरून पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होईल.


पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही तर शहरात पाणी साचते, सखल भागामुळे गृहसंकुलाना पाण्याचा वेढा निर्माण होतो, जनजीवन विस्कळीत होते, अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद होतात. त्यात वसई विरार शहरात १८७ किमी. लांबीचे एकूण १५० नाले आहेत. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात पावसाळी कामांसाठी एकूण १० कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने केली आहे.


वसई विरार शहरात अनेक रस्त्यांची दुरवस्था आहे पावसाळ्यात खड्यातून प्रवास करावा लागतो यावेळी अपघाताची शक्यता असते. त्यामुळे बांधकाम विभागाने निविदा काढून रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत जेणेकरून पावसाळ्यात वाहनांना सोईचे होणार आहे.


एव्हरशाईन येथील काम अंतिम टप्प्यात आले आहे तसेच गास चुळणे येथे रस्ता उंच केला असून खडीकरण काम केले जात आहे परंतु काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना अन्य महत्त्वाची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

Pranit More : कॉमेडियन प्रणित मोरे वादाच्या भोवऱ्यात; आक्षेपार्ह व्हिडीओवर माफी, म्हणाला- ती चूक झाली

Pranit More Controversy : बिग बॉस 19 चा स्पर्धक आणि प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे वादात सापडला आहे.

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा

Actress Sambhavna : शेवटी देवाने एका आईची हाक ऐकलीच; चक्क ४५ वर्षांच्या अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म

मुंबई : लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की तिने आई व्हाव . काहीचं हे स्वप्न पूर्ण होतं तर काहींचं होत नाही

Ritesh Deshmukh : "महाराजांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता"; व्हायरल व्हिडीओनंतर रितेश देशमुखचे स्पष्टीकरण, ट्रोलर्सना दिले चोख उत्तर

मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश

Jalgaon News : १२ वर्षीय गणेशच्या मृत्यूला नवं वळण; दोन महिन्यांनंतर मृतदेह बाहेर काढला

जळगाव : जळगावच्या धरणगाव (Dharangaon ) तालुक्यातील रेल येथे क्रिकेट खेळत असताना १२ वर्षीय गणेश नवल पाटील या मुलाचा मृत्यू

Kandivali Crime: कांदिवली मेट्रो लिफ्टमधील विनयभंग प्रकरण; फरार आरोपीला ट्रेनमधून अटक

मुंबईतील कांदिवली भागात असलेल्या धहानुकरवाडी मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग