सावरकर विचार जागरण सप्ताहाची आज सांगता

रत्नागिरी : गेले आठवडाभर रत्नागिरीसह राज्यात पाच ठिकाणी सावरकर विचार जागरण सप्ताह सुरू आहे. या सप्ताहची सांगता ता. २८ शोभायात्रा, सहभोजनाने होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमासाठी ऐतिहासिक पतितपावन मंदिराची निवड झाली आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, तसेच राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.



शासनाने वीरभूमी परिक्रमेंतर्गत पर्यटन संचालनालय, मुंबईतील विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था व श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर विचार जागरण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्वा. सावरकर चौक ते हनुमान मंदिर, शिरगाव इथपर्यंत बाईक रॅली, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, पथनाट्ये, वाळूशिल्प, त्या तिघी नाट्यप्रयोग होईल. रविवारी सकाळी ८ वाजता कारागृह सावरकर स्मारक येथून शोभायात्रेला सुरुवात होईल. वीर सावरकरांची दि. २८ रोजी १४० वी जयंती असून सकाळी ८ वाजता कारागृह येथील स्वा. सावरकर स्मारक येथून शोभायात्रा निघणार आहे. जयस्तंभ, एसटी स्टँड, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिर येथे शोभायात्रेची सांगता होईल. यात विविध संस्थांचे चित्ररथ सहभागी होतील. शोभायात्रा पतितपावन मंदिरात पोहोचल्यानंतर विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान मंत्री मंगल प्रभात लोढा, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक रवींद्र भोवड, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, माजी अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर, भागोजीशेठ कीर ट्रस्टचे ट्रस्टी अॅड. विनय आंबुलकर यांनी केले आहे.


मंगल प्रभात लोढा करणार मार्गदर्शन


मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे येथे आगमन झाल्यावर १९५ वर्षे पूर्ण झालेल्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयास सदिच्छा भेट देतील. भाजप कार्यालयात लोकसभा कोअर समिती सदस्य बैठक, शहर बुथ अध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन, सप्ताहानिमित्त आयोजित शोभायात्रेत सहभाग, सकाळी ११ वाजता पतितपावन मंदिरात मन की बात कार्यक्रमास उपस्थिती, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक.

Comments
Add Comment

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.