डहाणू, तलासरीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात भूकंपाची श्रृंखला सुरूच आहे. मागील सहा महिन्यांपासून थांबलेली भूकंपाच्या धक्क्यांची मालिका पुन्हा सुरू झाली आहे. शनिवारी एका पाठोपाठएक असे दोन भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे. सुदैवाने या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घराबाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबले.



डहाणू, तलासरी परिसरातील गावांना सतत सौम्य ते मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डहाणू, घोलवड, बोर्डी, धुदवाडी, तलासरी ही गावे भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहेत. गुजरात राज्यातील उंबरगाव, संजान, भिलाड आणि दादरा-नगर हवेली येथील सिल्वासापर्यंत भूकंपाचे हादरे बसले आहेत. यात जीवितहानी झाली नसून काही घरांना मात्र तडे गेले आहेत. भूकंपाच्या धक्क्यांनी मुहूर्त साधला असून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील काही गावे पुन्हा हादरली. मागील काही वर्षांपासून डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून भूकंपाचे धक्के थांबले होते. मात्र शनिवारी लागोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी ५ वाजून १६ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचा, तर ५ वाजून २४ मिनिटांनी जाणवलेल्या दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल एवढी नोंदविण्यात आली.



डहाणू-तलासरी तालुक्यातील गावांमध्ये शनिवारी जोरदार भूकंप होऊन जमीन चांगलीच हादरली, हे जोरदार धक्के बसल्याने तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही भयभीत होऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले. भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा

रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्याने सात कंपन्यांची निवड, दोन वर्षांसाठी तब्बल २५७कोटी रुपये करणार खर्च!

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील रस्त्यांखालून तसेच पदपथांखालून विविध सेवा सुविधांचे जाळे पसरले गेलेले असून अनेकदा

महापालिकेच्या केईएम,शीव, नायर रुग्णालयांची भिस्त खासगी सुरक्षेवर, महिन्याला एवढा होतो खर्च...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक खात्यातील रिक्तपदे वाढतच चाललेली असून आजही महापालिकेच्या