मिऱ्या-नागपूर चौपदरीकरण कामात कंपनीचा अतिरेक

साखरपा : सध्या रत्नागिरी-नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे सुरुवातीला रस्त्यांवरील मोठमोठी झाडे तोडण्यात आली. त्यानंतर टप्प्या टप्प्यात रुंदीकरण व रस्ता कटाई कामाला प्रारंभ झाला. सध्या साखरपा गावात हायवे बाधित बांधकामे तोडण्यास अचानक प्रारंभ झाला आहे. कंपनीला २ वर्षे कामाची मुदत असून लवकरात लवकर घरे खाली करावी, असे सांगण्यात आले आहे. मात्र या आधी कोणतीही सूचना किंवा नोटीस कोणालाही प्राप्त झालेली नाही. त्यातच अचानक पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या या मोहिमेमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरादारांवर जेसीबी फिरविण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.


पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अशाप्रकारे कंपनीच्या अरेरावी विरोधात स्थानिक नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ऐन पावसाळ्यात कुठे जायचे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर आहे. तसेच काही घरांना कुलूप असताना बांधकामे तोडली जात आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यावेळी पाण्याचे मोठमोठे प्रवाह वाहतात. अशा वेळी मोठमोठे मातीचे ढीग करून मातीचे रस्ते तयार केले आहेत. यामुळे मोठ्याप्रमाणात चिखल होऊन अपघात घडू शकतात. याची कोणतीही खबरदारी कंपनीने घेतली आहे का असा सवाल येथील नागरिकांतून तसेच प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे. फक्त कामाचा वेग असून चालत नाही, प्रतिबंधात्मक उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे.


काही ठिकाणी घरे तोडण्याबाबत नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग अधिकारी सहकार्याच्या भूमिकेत असून कंपनी प्रशासन मात्र हातोडा फिरवत आहे. तसेच काही ठिकाणी मोबदला मिळाला नसूनसुद्धा बांधकाम हटविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे कसे लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील