स्व. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना भाजपबद्दल बोलण्याचा अधिकार नाही

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जो मानसन्मान देतात तेवढा उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेबांना कधी दिला नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना जाहीर सभेतून कसे अपमानित करून पाठवले, हे संपूर्ण राज्यातील जनतेने पाहिले आहे. अशा लोकांना आडवाणी किंवा भाजपबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केली.



पुढे नितेश राणे म्हणाले की, सकाळी उठून संजय राऊत हे संसद भवन उद्घाटनाची तीच तीच टेप वाजवित आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल बोलत आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी लवकरच बरे होतील. तेव्हा संजय राऊत त्यांच्याबद्दल तेव्हाची शिवसेना आणि उद्धव ठाकरे कसे वागले हे सांगतील काय? शिवसेनेत राऊत यांच्यापेक्षा कित्येक उन्हाळे, पावसाळे जास्त पाहिलेले नेते आहेत. मनोहर जोशी हे सेनेचे काम करत होते, तेव्हा तुम्ही लोकप्रभामध्ये विरोधात लिहीत होता. जेव्हा ते शिवसेना वाढवत होते. तेव्हा उद्धव ठाकरे हे फोटो काढायला कॅमेरा साफ करत होते. मात्र याच माजी मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशी यांना जाहीर सभेतून कसे अपमानित करून पाठवले हे संपूर्ण राज्यातील जनतेने पाहिले आहे. दिवाकर रावते, रामदास कदम अशा अनेकांचा अपमान कशा प्रकारे केलात? हे आम्हाला माहीत आहे. संसद भवनच्या कार्यक्रमात तुम्हाला आमंत्रणच नाही. कारण तुमचा पक्षच राहिलेला नाही. असे असताना बहिष्काराची भाषा करता, असे खडे बोलही नितेश राणे यांनी सुनावले.

Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या