स्व. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना भाजपबद्दल बोलण्याचा अधिकार नाही

  169

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जो मानसन्मान देतात तेवढा उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेबांना कधी दिला नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना जाहीर सभेतून कसे अपमानित करून पाठवले, हे संपूर्ण राज्यातील जनतेने पाहिले आहे. अशा लोकांना आडवाणी किंवा भाजपबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केली.



पुढे नितेश राणे म्हणाले की, सकाळी उठून संजय राऊत हे संसद भवन उद्घाटनाची तीच तीच टेप वाजवित आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल बोलत आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी लवकरच बरे होतील. तेव्हा संजय राऊत त्यांच्याबद्दल तेव्हाची शिवसेना आणि उद्धव ठाकरे कसे वागले हे सांगतील काय? शिवसेनेत राऊत यांच्यापेक्षा कित्येक उन्हाळे, पावसाळे जास्त पाहिलेले नेते आहेत. मनोहर जोशी हे सेनेचे काम करत होते, तेव्हा तुम्ही लोकप्रभामध्ये विरोधात लिहीत होता. जेव्हा ते शिवसेना वाढवत होते. तेव्हा उद्धव ठाकरे हे फोटो काढायला कॅमेरा साफ करत होते. मात्र याच माजी मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशी यांना जाहीर सभेतून कसे अपमानित करून पाठवले हे संपूर्ण राज्यातील जनतेने पाहिले आहे. दिवाकर रावते, रामदास कदम अशा अनेकांचा अपमान कशा प्रकारे केलात? हे आम्हाला माहीत आहे. संसद भवनच्या कार्यक्रमात तुम्हाला आमंत्रणच नाही. कारण तुमचा पक्षच राहिलेला नाही. असे असताना बहिष्काराची भाषा करता, असे खडे बोलही नितेश राणे यांनी सुनावले.

Comments
Add Comment

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली