सावित्री नदीच्या काठावर संरक्षक कठड्यांच्या बांधकामाला वेग

पोलादपूर (प्रतिनिधी) : २०२१ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्यालगतचे संरक्षक कठडे कोसळलेल्या ठिकाणी गॅबियन नेटवर्क स्ट्रक्चरने कठडे उभारण्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी रानबाजिरे धरणापासून सावित्री नदीचे पात्र भरधाव वेगाने येऊन आदळत असल्याने या गॅबियन नेटवर्क स्ट्रक्चर पध्दतीचे कठडे आगामी काळात किती तग धरू शकतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.



कुडपण येथे वऱ्हाडाचा टेम्पो गॅबियन नेटवर्क स्ट्रक्चर तंत्राच्या संरक्षक कठड्याला धडकल्यानंतर गॅबियन तंत्राच्या ठिकऱ्या उडवत दरीत कोसळून तीन जण ठार तर अनेकजण जखमी झाले होते. यामुळे हे तंत्र संरक्षक कठडे बांधण्याकामी कुचकामी असल्याचे स्पष्ट झाले होते. यापूर्वी येथे १०० मीटर्स लांबीची काँक्रीटची संरक्षक भिंत काही वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. मात्र २०२१ च्या महापुरामध्ये ती वाहून गेली. आता या ठिकाणी गॅबियन नेटवर्क पद्धतीचे स्ट्रक्चर उभारून कठडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी नदीपात्र आणि रस्त्यालगत तब्बल चार मीटरचा मोठ्या दगडांचा भराव करण्यात आला असून त्यावर दगड, गोटे, कपाऱ्या आणि खापऱ्यांची लोखंडी जाळीमध्ये बांधणी करून कठडा उभारला जात आहे. यामध्ये कोठेही सिमेंट काँक्रीटचा वापर करण्यात आला नाही. या पध्दतीचे काम टीकावू नसते. त्यामुळे पुन्हा पावसाळयात ते वाहून जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका