मविआची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत : नितेश राणे

कणकवली : भाजपच्या प्रत्येक गोष्टीवर टीकेची झोड उठवणा-या संजय राऊतांची 'मविआची गौतमी पाटील' असा उल्लेख करत भाजप आमदार नितेश राणेंनी राऊतांची चांगलीच जिरवली आहे. ते म्हणाले "गौतमी पाटील एक उत्तम कलाकार आहे. ती वेगवेगळ्या कार्यक्रमांत जाऊन नाचते, लोकांना नाचवते, लोकांमध्ये लोकप्रिय पण असेल. अशा गौतमी पाटीलला मी विनंती करेन की तुझं मेकअपचं थोडं सामान असेल तर संजय राऊतांकडे पाठव व त्याचं थोबाड जरा रंगव".


ते संजय राऊतांसारखे दलाल नाहीत


खासदार गजानन किर्तीकरांनी केलेल्या भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याच्या आरोपावर संजय राऊतांनी भाजपने आपला मूळ स्वभाव बदललेला नसल्याचं म्हटलं. यावर नितेश राणे म्हणाले, "गजानन कीर्तीकरांबद्दल काळजी करु नका. ते हाडाचे शिवसैनिक आहेत व ते बाळासाहेबांच्या विचारांसोबत कधीही तडजोड करणार नाहीत. ते संजय राऊतांसारखे दलाली करणार्‍यांपैकी नव्हेत".


दरम्यान ज्या गजानन कीर्तीकरांची तुम्हाला आता आठवण येतेय त्यांच्याच घरात वाद लावण्याचा प्रकार सुरु आहे, उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना त्यांच्याच वडिलांविरूद्ध लढवण्यासाठी तयारी केली आहे, असा आरोप नितेश राणेंनी केला.


संजय राऊत हा रंग बदलणारा सरडा


'भाजप हा पक्ष अजगर किंवा मगरीप्रमाणे आहे. तो सोबतींनाच गिळत सुटतो. हे शिंदे गटाला आता हळूहळू कळायला लागले आहे', असं संजय राऊत म्हणाले होते. त्यालाही नितेश राणेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे रंग बदलणा-या सरड्याप्रमाणे आहेत, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केली.


याबाबत नितेश राणे म्हणाले, "तेजस उद्धव ठाकरेंना प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या नवनवीन प्रजाती शोधण्याचा छंद आहे. त्यामुळे लांबलांबच्या ठिकाणी जाण्यापेक्षा एकदा सामना कार्यालयात जाऊन त्या सरड्याला पकडून त्याचा अभ्यास करावा, असं माझं म्हणणं आहे. सरड्यालाही लाज वाटेल एवढ्यांदा ते रंग बदलतात".

Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या