ज्येष्ठ समाजवादी नेते रविंद्र वैद्य यांचे निधन

  208

जव्हार : ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांचे शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता जव्हार येथे देहावसान झाले. ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल गुरुवार, २५ मे रोजी त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांचे सुपुत्र संदीप (जव्हारचे माजी नगराध्यक्ष) यांनी त्यांना जव्हार येथील कॉटेज रुग्णालयात दाखल केले. परंतु मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन विवाहित कन्या, मुलगा संदीप, सून, नातवंडे असा परिवार आहे.


प्रजा समाजवादी पक्ष सुरु करुन आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केलं. दत्ता ताम्हाणे यांच्या प्रेरणेतून जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी भागात आदिवासींच्या विविध प्रकारच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. गोवा व दमण मुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता.


साप्ताहिक आहुती बरोबरच मुंबई येथील नवशक्ती दैनिकाचे बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. राजकारणाबरोबरच मराठी पत्रकारितेत त्यांनी आपला ठसा उमटविला होता. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी काम केले. आणीबाणीच्या काळात त्यांनी दोन वर्षे कारावास भोगला होता.


१९९७ साली त्यांच्या पत्नी सौ. नीला यांचे निधन झाले. त्यानंतर रवींद्र वैद्य यांची प्रकृती ढासळत होती. यातूनही गेल्या आठवड्यात ते एका कार्यक्रमासाठी मुंबई येथे आले होते. मात्र काल फारच प्रकृती खालावल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले व तिथेच त्यांचे निधन झाले.

Comments
Add Comment

99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यावर्षी साताऱ्याला!

तब्बल ३२ वर्षानंतर भरवले जाणार चौथे संमेलन पुणे:  यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण